भाडोत्री पुढाऱ्यांची गुलामगिरी( डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीतून )

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.
ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मणग्रस्त लोक आमचे वैरी आहेत
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक – धनंजय किर. पृष्ठ. क्र.101. पैरा – दुसरा मधली ओळ. यामध्ये लोकशाही विरोधी ब्राह्मणग्रस्त लोक हे होत. याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
ब्राह्मणांनी संपूर्ण देशाचा व जनतेचा सर्वतोपरी सत्यानाश केला आहे. या माझ्या विधानाची कुणाला ऐतिहासिक माहिती हवी असेल तर मी देण्यास तयार आहे. माझे म्हणणे हे खोटे आहे असे येथे कोणाला सांगावयाचे असेल तर त्याने ते सांगावे ते मी खोडुन टाकण्यास तयार आहे.
संदर्भ – खंड. क्र.18. भाग – 1 पृष्ठ. क्र.32 – 33. प्रकरण – मी माझ्या आंधळ्या जनतेची काठी आहे.
पुन्हा ते उपदेश देऊन सांगतात आणि म्हणतात –
तुम्ही कोणाचीही गुलामगिरी म्हणू नका. मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे. ही जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची नेहमी दिशाभूल करीत असते. तिच्या बौद्धिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून अस्पृश्यांना ( आताचे बौद्ध ) या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कारण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्र.32. पैरा – शेवटचा.
वरील सर्व गोष्टीचा आपणा सर्वांना परामर्श घेऊन स्वावलंबनाने व संघशक्तीने कसे एकजूट राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणतात –
असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे आणि आपला खरा हितकर्ता कोण आहे हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे याची तुम्हीच निवड करा……..!
परंतु आपण सर्व लोक जागृत झालात. तुम्हाला तुमचे हित कशात आहे हे ” संघशक्तीने व स्वालंबनाने ” कळावेस लागले तर आपण एक चुटकी सरशी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊ शकाल.
संदर्भ – खंड.18 भाग – 2. पृष्ठ. क्र.74 – 75. पैरा – शेवटचा व पहिला.
वरील प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपणा सर्वाना वागण्यास आणि आचरण करण्यास सांगितले असतांना ही आपलेच पायपोस आपल्यात नाहीत. आजन्म त्यांनी ब्राम्हणी विरोधक लोकांचा विरोध पत्करला. त्यांच्या निधना नंतर पक्षाची शक्ले करून सत्ताधारी संघाच्या दावणीला मुसके बांधून, पायात घुंगरू बांधून गुलामगिरी पत्करत आहेत. या विषयीं ते म्हणतात –
गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून अज्ञानी लोकांना फसवितात. ” पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते.
संदर्भ – खंड.18 भाग – 1. पृष्ठ. क्र.3 – 4. पैरा – शेवटचा आणि पहिला.
पुढे ते म्हणतात –
आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरता लढा चालविला आहे. त्यात तुम्हास यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा,” तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्दीत पडाल, ज्या स्पृश्य हिंदूंनी आजपर्यंत तुम्हाला दास्यत्वात कितपत ठेवले ते तुम्हाला आम्हीच दाखवून मदत करण्याकरता एका पायावर तयार देखील होतील. “
पण जर तुम्ही या मोहाला बळी पडलात तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही.
संदर्भ – खंड. क्र.18 भाग – 1. पृष्ठ. क्र.449. पैरा – 2 मधली ओळ.
दर ठिकाणी या पांढरपेशा भटा – ब्राह्मणांचा सुळसुळाट झालेला दिसेल संदर्भ – खंड. क्र 18 भाग – 2.पृष्ठ. क्र.116. पैरा – दुसरा.
वरील संदर्भातील त्यांनी लिखित केलेले शब्द पहा आणि वाचा –
पण जर तुम्ही या मोहाला बळी पडला तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल. तुमच्या नशिबाची ठरणार नाही
तसेंच कसाबखान्याकडे तुमची वाटचाल होईल.
दर ठिकाणी या पांढऱ्या पेशा भटा- ब्राह्मणांचा सुळसुळाट झालेला दिसेल.
सदर तिन्ही संदर्भातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचारसरणीच्या दूरदृष्टीकडे आपण न्याहाळले असता आजही त्यांचे वाक्य तंतोतंत खरे ठरत आहे. आणि शेवटी ते मोठ्या खिन्न मनाने म्हणतात –
माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे. पण माझ्या पश्चात या समाजाचे कशी होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टीचा विचार केला की , माझे आयुष्य तुझ्यासाठी फुकट खर्च घातले असे वाटू लागते.
संदर्भ – खंड. क्र.18. भाग – 3 पृष्ठ. क्र.315. पैरा – 1.
समाजहित जपणारी कार्यकर्त्या पुढाऱ्यांची फळी असायला हवी. याबाबत ते म्हणतात –
कार्यकर्ते भाडोत्री नसावे. कार्याकरिता कळकळीची आस्थेची माणसे पाहिजेत. स्वतःचा स्वार्थ साधणारी नि तळीपार करणारी माणसे नकोत. जे प्रेम करू शकतात तेच सेवा करू शकतात.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लेखक – धनंजय किर. पृष्ठ. क्र.250. पैरा – खालून दुसरा.
दि.24 डिसें 23.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत