नळदुर्ग शहरात रिक्षाचालकां कडून मनमानी भाडे आकारणी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्याची मागणी

रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनासह परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवुन कारवाई करावी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहरात रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही गैरसोय होत असून, संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून येथे प्रसिद्ध नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी विविध भागांतून पर्यटक येतात. शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातून आठवडी बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी रिक्षा हे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे. मात्र काही ठिकाणी प्रवाशांकडून ठरावीक भाड्यापेक्षा अधिक रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी आहेत
शहरातील बसस्थानक ते किल्ला गेट, चावडी चौक, मराठा गल्ली, इंदिरानगर, भीमनगर, बुद्धनगर, डॉ. आंबेडकर नगर आदी परिसरात प्रवासासाठी पूर्वी कमी भाडे आकारले जात असल्याचे नागरिक सांगतात. मात्र सध्या काही रिक्षाचालकांकडून अंतरानुसार वेगवेगळे आणि जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही प्रवाशांकडून तब्बल ५० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक भाडे मागितले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषबाब म्हणजे रविवारी नळदुर्ग शहरात आठवडी बाजार भरतो. यावेळी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक व्यापारी शहरात येतात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाजारात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांना प्रवासासाठी जादा भाडे द्यावे लागू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ते उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी जनतेतून होत आहे एखादी बस बस स्थानकात दाखल झाल्यानंतर मग काही रिक्षा चालक प्रवाशांच्या भोवती गर्दी करून त्यांना रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करतात अशा तक्रार ही नागरिकांतून करण्यात येत आहेत त्यामुळे बस स्थानकात परिसरामध्ये प्रवेशाची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी संबंधित विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे
रिक्षाची कागदपत्रे तपासण्याची गरज आणि मागणी
शहरातील रिक्षाची संख्या किती आहे संबंधित रिक्षांना वैद्य परमिट आहे का? चालकाकडे वैद्य वाहन परवाना व बॅच आहे का रिक्षाचे आरसी विमा फिटनेस प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्र अद्यावत आहेत का? याची तपासणी करण्याची आजच्या काळाची गरज आहे
परिवहन विभागाचे चक्क दुर्लक्ष
रिक्षा चालकासाठी शासनाने निश्चित केलेले भाडे नियम व प्रवाशांच्या हक्काची माहिती नागरिकांना स्पष्टपणे उपलब्ध करून देण्यात यावी तसेच नियमबाह्य पद्धतीने जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकावर संबंधित परिवहन पोलीस प्रशासनाने नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे
परंतू परिवहन विभागाचा एकही अधिकारी नळदुर्ग शहरामध्ये दिसून येत नाही , त्यामुळे नळदुर्ग येथील रिक्षा चालकांचा नागरिकावर होत असलेला मज्जाव थांबत नाही.
कारण परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने हे मनमानी भाडे वाढ होत आहे
नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड , कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके , कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे , तसेच पोलीस उपनिरीक्षक अकतर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांच्या नियमबाह्य प्रकारावर लक्ष ठेवून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे
सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये पर्यटकांना योग्य सेवा मिळाली पाहिजे आणि रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी यासाठी प्रशासनासह परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


