
सर्व महिला स्वयंपूर्ण झाल्या तरच भारत विकसित होऊ शकतो असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. विकसित भारतासाठी महिलांनी महत्त्वाचं योगदान द्यावं. राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये लखपती दीदी परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांना स्वयंपूर्ण करण्यात बचत गट महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. कामकाजात महिलांचा समान सहभाग देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पोखरणमध्ये लष्कराकडून आयोजित प्रात्यक्षिकंही त्यांनी पाहिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत