यापुढे विद्यार्थ्यांना विचारात घेतल्या शिवाय देश चालवू शकणार नाहीत -ॲड. डॉ. एस के भंडारे.

दहावी बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व अभ्यासिका उदघाटन
मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निरंतर शिक्षण घेऊन देशात क्रांती केली, त्या बाबासाहेब यांचा आदर्श घेऊन विदयार्थ्यांनी आपली प्रगती करायला हवी आणि देशातील विद्यार्थी काय करू शकतात हे जंतर मंतर वरील आंदोलनाने दाखवून दिलेले आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांचे हित व त्यांना विचारात घेतल्याशिवाय देश चालवू शकणार नाहीत असे प्रतिपादन,भारतीय बौद्ध महासभा शाखा सुमन नगर, डॉ. आंबेडकर सेवा कमिटी च्यावतीने सुमननगरच्या अंगुलीमाल बुद्ध विहारात दिनांक 9/8/2026 रोजी आयोजित दहावी बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि सुमननगरच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे उदघाटन कार्यक्रमात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा ) चे ट्रस्टी /राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ऍड डॉ एस के भंडारे यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चेंबूर चे प्रिन्सिपल डॉ.अर्चना हंडोरे मॅडम,चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रशांत तायडे, स्थानिक नगरसेविका स्नेहल विष्णू शिवकर, समाजसेवक युवा कार्यकर्ता स्वप्निल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.झोन क्रमांक पाचचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी मुख्य सूत्रसंचालन केले. झोन कोषाध्यक्ष नारायण निकाळजे, केंद्रीय शिक्षक विजय जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक शाखेचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस विशाल कदम, कोषाध्यक्ष राजू कांबळे,डॉ.आंबेडकर सेवा कमिटीचे अध्यक्ष रामदास मोरे . खजिनदार,अध्यक्ष शंकर तांडेल इत्यादीनी केले होते. या कार्यक्रमास व विभागातील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सभासद स्थानिक कमिटी सभासद हे सर्व आणि विभागातील उत्तीर्ण झालेले सर्व धर्मीय विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठया उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


