
ऐका बाजारात तितर पक्षी विकणारा बसला होता. त्याच्याकडे मोठ्या जाळीच्या टोपलीत बरेच तितर पक्षी होते.. एका छोट्या जाळीच्या टोपलीत फक्त एकच तितर पक्षी होता. एका ग्राहकाने विचारले, एक तितर पक्षी कितीचा आहे? ५० रुपयाला. ग्राहकाने छोट्या जाळीत असलेल्या तितर पक्ष्याची किंमत विचारली. तर तो पक्षी विकणारा म्हणाला, “मला ह्याला विकायचं नाही!” पण तू आग्रह धरत असशील तर मी पाचशे रुपये लावीन !” ग्राहकाने आश्चयनि विचारले, ह्या तितर पक्ष्याचा भाव इतका कसा काय ? पक्षी विकणारा म्हणाला, खरंतर हा माझा स्वतःचा पाळीव पक्षी आहे आणि तो इतर तितर पक्ष्यांना अडकावण्याचे काम करतो. जेव्हा तो जोरात ओरडतो आणि इतर तितर पक्ष्यांना स्वतःकडे बोलावतो आणि इतर तितर पक्षी विचार न करता एकाच ठिकाणी जमतात, तेव्हा मी त्या सर्वांची सहज शिकार करतो. नंतर मी या माझ्या पाळीव तितर पक्ष्याला त्याच्या आवडीचा खुराक देतो. त्यामुळे तो आनंदित होतो. म्हणूनच त्याची किंमत खूप जास्त आहे! मग त्या माणसाने पक्षी विकणाऱ्याला पाचशे रुपये देऊन तो तितर खरेदी केला व तिथेच त्याची मान मुरगाळून त्याला मारले. एकाने विचारले, अहो तुम्ही असं का केलं? त्याचे उत्तर होते, जो आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या समाजबांधवांना अडकविण्याचे, फसविण्याचे काम करतो, अशा विश्वासघात करणाऱ्याला जगण्याचा हक्क नाही ! असे खूप ‘तितर’ आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांना शोधा, ओळखा व त्यांची संगत सोडा !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत