
मच्छिमारी करणाऱ्या २ हजार तीनशे एक कुटुंबाना प्रत्येकी साडे १२ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सांगितले. बोटींचे गंभीर नुकसान झालेल्या ७ शे ८७ मच्छिमारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली जाईल. मिचौंग चक्रीवादळात एन्नोर खाडीमधल्या तेलगळतीमुळे नुकसान झालेल्यांना तामिळनाडू सरकारने ८ कोटी ६८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. चेन्नई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि तेलगळतीमुळे बाधित झालेल्या ६ हजार सातशे कुटुंबांना प्रत्येकी ७ हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत