महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

आदरणीय डॉ हर्षदीप कांबळे सर यांना दैनिक जागृत भारत तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

महाराष्ट्र उद्योग विभागाचे चीफ सेक्रेटरी,तरुणांचे प्रेरणास्थान, आंबेडकरी समाजाचे आशास्थान, तरुण, तडफदार (आय.ए.एस) आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांना दैनिक जागृत भारत तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
त्यांना उदंड आयुष्य लाभो, व अशीच अविरत त्यांच्या हातून समाजसेवा घडो ही सदिच्छा आपला-डी एस सावंत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त 2020 ला लिहिलेला लेख मी पुनश्च जागृत भारत मध्ये देत आहे.

दान परिमिता, कोरोना आणि आपण बुद्धिष्ट: हर्षदीप कांबळे…..
” जरी संकटाची काळरात्र होती, तरी भिमराया तुझी साथ होती” असे एका कवीनी रास्त म्हटले आहे. आज काळ रात्र आहे, परंतु आता बाबासाहेब हयात नाहीत त्यामुळे,आपण सर्वजण मिळून,आपणालाच समाजासाठी उभे राहावे लागेल! असा विचार करणाऱ्यामधील, अत्यंत डायनॅमिक, अत्यंत संवेदनशील, जमिनीवरच पाय असणारे आणि मातीशी इमान राखणारे, समाजाच्या उत्कर्षा बद्दल अतिशय तळमळ असणारे आणि आपली महत्त्वपूर्ण अशी नोकरी संभाळून कृतिशीलतेने समाजसेवा करणारे आयएएस ऑफिसर म्हणजेच हर्षदीप कांबळे साहेब होत!

दानपरिमिता पाळणाऱ्यापैकी अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना व्हेनीच मॅडम आहेत. समाजाने त्यांची तळमळ त्यांचे मोठेपण वेळीच ओळखायला हवे.

आज बाबासाहेबांचे असे अनेक सच्चे अनुयायी आहेत की जे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन त्यांनी सांगितलेल्या सदृदमार्गा वरून जात समाजाची सेवा करीत आहेत. मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे, त्यामध्ये हर्षदीप कांबळे हे निश्चितच अग्रभागी आहेत.
भारताबरोबर जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. कोरोनामुळे सर्वच समाजाची प्रचंड हानी झाली होती. मनुष्यहानी बरोबरच अनेक उद्योग बंद पडले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, हातावरचे पोट असणाऱ्यावर तर उपासमारीची पाळी आलेली आहे. एका औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे मृत्यू झाले आहेत त्यापैकी 30 टक्के बौद्ध समाजातले आहेत हे फारच गंभीर आहे. यामध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लोकोपयोगी आहे त्यांनी अनेकांना आधार दिला अनेक लोकोपयोगी काम करणारा हा कर्मयोगीच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये
डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेबांकडे दूरदृष्टी आहे त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे ते इम्प्लिमेंट करण्यासाठी मात्र तुम्हा आम्हा सर्वांची गरज आहे, त्यानुसार आपण यथाशक्ति रिसोर्सेस निर्माण केले तर गरीब आणि गरजूंना त्याचा लाभ होईल.
भारतात मुस्लीम, जैन, शीख इत्यादी उदात्त भावनेने एकत्र येऊन मानवाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा याचे कृतिशील उदाहरण जगापुढे देशापुढे ठेवतात तसे बौद्ध बांधव ही करतात परंतु त्यांची संख्या प्रचंड वाढली पाहिजे अशी इच्छा डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब व्यक्त करतात.
जे समाजबांधव बाबासाहेबांच्या विशाल कार्यकर्तृत्वामुळेच लाभान्वित झालेले आहेत, नोकरी,धंद्यामध्ये आहेत, प्रोफेशनमध्ये आहेत, सुस्थितीत आहेत यांची नाळ सामान्य समाज बांधवाशी, कार्यकर्त्यांशी जोडलेली असले पाहिजे अन्यथा आपण सर्वजण एकाकी पडू! आज आपल्यातील दुरावा प्रकर्षाने दिसतो आहे म्हणून आपला शत्रू आपणावर वार करण्यास पुढेमागे पहात नाही.
अशा या महामारीच्या काळामध्ये आपण जे काही शक्य होईल ती मदत घेऊन पुढे आले पाहिजे. त्याचे नियोजन कांबळे साहेब तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर,राज्य पातळीवर व्यवस्थित करून तमाम मानव सेवेसाठी आपण हातभार लावला पाहिजे अशी आशा अपेक्षा सुस्थितीत असलेल्या बौद्ध बांधवांकडून कांबळे साहेब करत आहेत आपण कूपमंडूक प्रवृत्ती सोडली पाहिजे आणि खरे काम करणाऱ्यांना साथ दिली पाहिजे.
तूर्तास एवढेच.
जय भीम, नमो बुद्धाय.
डी एस सावंत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!