उध्दव ठाकरे प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत का नसावे ? – संजय राऊत यांनी वर्तविली शक्यता.

सांगली : लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून बऱ्याच राजकीय दिग्गजांचे भविष्य EVM मध्ये बंद झाले आहे.
खासदारकीच्या गणितात भर टाकत संजय राऊत यांनी सर्वांना आश्चर्य चकित करणारा खुलासा केला आहे. सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवाल त्यांनी केला.
देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात शिंदे गट आणि अजित पवार गट हे नामशेष होतील असेही ते म्हणाले.
दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत