देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मोदी विरूध्द काँग्रेस आक्रमक; निवडणूक आयोगाने तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास न्यायालयात धाव घेणार ?

नवी दिल्ली : लोकसभा 2024 च्या प्रचार सभेत राजस्थान येथे बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाबद्दल तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी काँग्रेसने दाखल केलेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसल्याने आयोग कारवाई करण्यात भेदभाव करत असल्याची भावना गडद होत आहे.

२०१९ प्रमाणे या वेळीही काँग्रेसने मोदींविरोधात लेखी तक्रार केल्यामुळे आयोगाला निर्णय घ्यावा लागणार असून दिरंगाई केल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. राजस्थानमधील प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आधार घेत पक्षावर ‘संपत्तीच्या फेरवाटपा’चा आरोप केला होता. हिंदूंची संपत्ती, हिंदू महिलांचे मंगळसूत्रदेखील काँग्रेस हिसकावून घेईल आणि जास्त अपत्य जन्माला घालणाऱ्यांना, घुसखोरांना (मुस्लिमांना) देईल, असे विधान केले होते. लोकसभा निवडणुकीत धर्माच्या आधारावर हिंदू-मुस्लीम भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींनी केला असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!