महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे चैत्र पौर्णिमा उत्साहात साजरी; महिलांच्या वतीने खीर दानाचे आयोजन.

धाराशिव : 23.4.2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा तुळजापूर च्या वतीने बौद्ध धम्मातील महत्त्वपूर्ण अशी चैत्र पौर्णिमा हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शहर अध्यक्ष अप्सरा ताई कदम, सचिव सुमित्राताई माने, यांच्या सह भीमजयंती उत्सव समिती 2024 चे पदाधिकारी, माधुरी ताई नागटिळक, रिनाताई वाघमारे, दिपाली ताई कदम, अश्विनी ताई कांबळे यांच्यासह मोठ्या संखेने माजी श्रामनेर, बालक बालिका उपस्थित होते.

सर्व प्रथम सर्व महिलांनी मुलांनी मिळून विहार स्वच्छ करून घेतले आणि आदर्शाचे पुष्प धूप दीप प्रज्वलित करून पूजन केले. गाथा पठण नंतर सुमित्राताई माने यांनी चैत्र पौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. आयु. संभव पगारे, आकाश कदम, दिपालीताई कदम यांनी मनोगत व्यक्त केले. चिमुकल्या इशिता कदम, सांची कांबळे, आरुषी कदम यांनीही सर्वांना पौर्णिमेच्या मंगल कामना दिल्या.

तथागत भगवान बुध्दांनी सुजाता च्या हातून खीर ग्रहण करून वैराग्य व्रत सोडलेला दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा. बौद्ध धम्मात या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. आपण प्रत्येक पौर्णिमा अतिशय हर्ष उल्हासात साजरी करूया असा संकल्प केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. देविदास विक्रांत कदम यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली ताई कदम यांनी केले.

सर्व महिलांनी मिळून बनविलेल्या स्वादिष्ट खिरीचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!