निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
मतदान नव्हे मताधिकार

अशोक सवाई.
मतदान म्हणजे दान द्या अन् विसरून जा. दानाचा काहीही हिसाब किताब नसतो. भक्त मंडळी मंदिरात गेल्यावर ते जे त्यांच्या इच्छा शक्ती नुसार किंवा ऐपतीप्रमाणे दान पेटीत दान टाकतात. त्याचा हिशोब घेणारा देत नाही अन् देणारा विचारत नाही. त्याचे ऑडिटही होत नाही, त्यामुळे मंदिरात खोऱ्याने ओढण्या इतके धन जमा होते त्यात सोने, चांदी, हिरे मोती, रुपये पैसे तर असतेच शिवाय धन्नासेठ अगदी प्लॅटिनम सारख्या अती मौल्यवान धातूचे दागिने सुद्धा दान करतात. हे सार धन बिनबोभाट त्या त्या मंदिराच्या पुजाऱ्याकडे जाते. ते इतके असते की, देशाच्या वार्षिक बजेट पेक्षा चार पाच पटीने जास्त असते. म्हणून मताधिकाराला मतदान म्हणू नये. मतदान हा शब्दप्रयोग चुकीचा आहे.
मताधिकार हा संविधानाने मतदाराला दिलेला संविधानिक अधिकार आहे. तो अधिकार मतदाराने बजावला पाहिजे. नाही बजावला तर संसदेत किंवा विधानसभेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर टिका टिपणी किंवा विरोध/समर्थन करण्याचा त्या मतदाराला नैतिक अधिकार राहत नाही. किंवा तो त्याच्या कामाचा हिशोब किंवा जाब विचारू शकत नाही. मतदाराने मताधिकार बजावला की लोक प्रतिनिधीला त्याच्या कामाचा हिशोब किंवा जाब विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. ज्याला तो प्राप्त होतो त्यालाच त्याचा मताधिकार म्हटले जाते. वृत्तसंस्था/वृतपत्रांनी हे लक्षात घेऊन आपापल्या वृत्तपत्रातून मताधिकार शब्दाचा प्रचार प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे. नव्हे ही वृत्तसंस्था व वृतपत्रांची मुख्य व महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यातून मतदार जागृत होवून त्याला त्याच्या मताधिकाराचं महत्त्व कळेल. आणि योग्य त्या ठिकाणी आपल्या मताधिकाराचा वापर करून योग्य प्रतिनिधी संसदेत/विधानसभेत निवडून जातील. त्यामुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होवून देशही मजबूत होईल. व जनतेच्या मजबूत हातात देश सुरक्षित राहील. निवडणूक निमित्ताने तूर्त एवढेच.
- अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत