राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे गृहखात्याबाबत ट्विट

गृहखात्याबाबत प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर जाब विचारला आहे.
महाराष्ट्रातील गृहखात्याचे अपयश हि अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने ढासळत आहे. याचा परिणाम म्हणून सातत्याने काहींना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नुकत्याच घडलेल्या काही हिंसक घटना आणि टिटवाळा, कल्याण येथे पास्टर जोस यांच्यावर झालेला हल्ला याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतरांवर होणारे वाढते हल्ले ही अतिशय काळजीची बाब आहे. अंतरवली, जालना येथे मराठा आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला आणि पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा येथील दंगल असो या घटना गृहखात्याचे अपयश अधोरेखित करीत आहेत. नागरीकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करुन आवश्यक ती पावले उचलणे अतिशय आवश्यक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत