प्रफुल्ल पटेलाच्या विधानाला प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते म्हणाले “‘इंडिया’ ही अनैतिक आघाडी”, …

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर टीका केली आहे. विरोधकांची विस्कळीत आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करू शकणार नाही. ही अनैतिक आघाडी आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं. याला काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीमुळे त्यांचे सरकारबरोबर अनैतिक संबंध जुळले आहेत, असं टीकास्र नाना पटोले यांनी पटेलांवर सोडलं आहे.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
“देशपातळीवर पंतप्रधान मोदी यांना पर्याय नाही. मोदींच्या विरोधासाठी एकत्र आलेली विस्कळीत आघाडी त्यांचा सामना करू शकणार नाही. केवळ फोटोसेशनपुरत्या बैठका आहेत. एकमताने साधं लोगोचं अनावरण होऊ शकत नाही. देश जुळणारच नाही तर जिंकणार कसा? त्यामुळे ही अनैतिक आघाडी आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं होतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत