ब्राह्मण कोण ?

प्रा.मुकुंद दखणे.
भगवान बुद्धाने सर्व प्रथम कार्य कारणाचा सिद्धान्त मांडला तोच सापेक्षतावादाचा सिद्धान्त होय.
सापेक्षतःवाद स्पष्ट करतो की,
वेद अर्थपुर्ण असते आणि वैदिक अज्ञानी नसते,
तर भगवान बुद्ध आणि भगवान महावीर घडले नसते.
आणि हिंदुधर्मात समानता असती आणि अस्पृश्यता, शुद्र नसते तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर घडले नसते तसेच भारतीयामध्ये अंधश्रद्धा नसती, वैज्ञानिकता असती, तर संत गाडगे बाबा कधीच घडले नसते आणि जर देशात बहुजन समाजात,भारतीयांमध्ये बहुसंख्य
प्रज्ञावंत असते तर जाती ब्राह्मण ही नसते आणि मंदीरेही नसती.
तसे भारत देश राजकीय गुलाम, इंग्रज सत्तेखाली नसता तर महात्मा गांधी कधीच बनले नसते.
वेदांना तथागत बुद्धाने तथ्यावर आधारीत नसलेले ठरविले.वेदात ब्रह्म जानतो तो ब्राह्मण असे म्हटले त्यासही तथागत बुद्धाने अर्थहिन ठरविले. भगवान बुद्धाने जन्मावर आधारीत ब्राह्मण नाकारले तर कर्मावर आधारीत ब्राह्मण ठरविले. ज्यांचे नैतिक कर्म श्रेष्ठ तोच ब्राह्मण, असे स्पष्ट मत आहे.
ब्राह्मण या शब्दात च खर्या अर्थाने त्या शब्दाचा खरा अर्थ दडलेला आहे. माझ्या संशोधनानुसार,” ज्याचा मनातील अहंकाराचा अंत होतो ,अशा कर्म श्रेष्ठ व्यक्तीच ब्राह्मण होय. जन्माने सर्व समान असतात. पण जो व्यक्ती आपल्या मनावर, मनातील तृष्णेवर विजय मिळवून समाज कल्याण साधतो अशाच महान व्यक्तिमत्वास ब्राह्मण म्हणावे असे भगवान बुद्धाचे स्पष्ट मत आहे. ब्र+अह्मं+ण =ब्राह्मण अर्थात, मनातील अहम् भाव[अहंकार]जो संपविण्यात सक्षम ठरतो तोच ब्राह्मण ठरतो. आणि जो जन्माने ब्राह्मण असतो, पिढीजात ब्राह्मण मानला जातो त्यासं भगवान बुद्धाच्या मते जाती ब्राह्मण होय.
पालि भाषेत जाति म्हणजे जन्म होय.
माझ्या अभ्यासानुसार या विश्वात फक्त दोनच महान व्यक्ती होऊन गेले ज्यांनी मनाच्या तृष्णेवर,[वान] अंहकारावर विजय मिळवून निब्बाण साधलेले असल्याने च त्यांनाच भगवान हा शब्द वापरले जातात.
वास्तविकतः भगवान या शब्दाचा अर्थ वान मुक्त किंवा तृष्णामुक्त मनुष्य असा होत असल्यानेच, ईश्वर या सन्मानार्थी भगवान शब्द वापरणे हे एकतर अज्ञान होय किंवा मुर्खपणा तरी होय. तसेच, कोणत्याही प्रकार चे श्रेष्ठ कर्म नसतांना जर कोणी जन्माच्या आधारीत स्वतःला ब्राह्मण घोषित करीत असेल तर तोही मुर्खपणा होय. माझ्या सखोल अभ्यास स्पष्ट आहे की, या विश्वात फक्त, भगवान बुद्ध आणि भगवान महावीर हे दोनच महापुरुष ब्राह्मण होय.
बाकी सर्व जातीब्राह्मण होय, जे जन्माने सर्व समान असतांना स्वतःला ब्राह्मण म्हणवुन घेतात आणि स्वतःसाठी समाजालाही धोका देत राहतात.
भारतीय संविधानाने अनुच्छेद 13 नुसार जाती ब्राह्मणत्व संपविलेले आहे तर अनुच्छेद 14 नुसार सर्व भारतीयांना समानतेचा दर्जा दिला असतांना कायदेशीर, संविधानात्म दृष्टा कोणीही आज भारतात ब्राह्मण
नाही.
मात्र ;भारतीय संविधानाला न मानणारे स्वतःला जाती ब्राह्मण घोषित राखलेले आहे. ही राष्ट्र घातक,राष्ट्र द्रोहाची
बाब आहे.
🌷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत