समता सैनिक दलाचे ऐतिहासिक एकत्रीकरण”

रमेश जाधव कोल्हापूर
दि.10 डिसेंबर 2023 रोजी चाळीसगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात आणि देशातील 6 राज्यात कार्यरत असणाऱ्या तीन समता सैनिक दलाच्या गटांचे एकत्रिकरण कॅप्टन अशोक खनाडे, वर्धा यांच्या अध्यक्षतेत तर अशोक टेंभरे, चंद्रपूर. रमेश जाधव, कोल्हापूर. धम्मा कांबळे, यवतमाळ. धर्मभूषण बागुल, चाळीसगांव. गुलाबराव राजे, रत्नागिरी. ऍड. अभय लोखंडे, नागपूर. राजभाऊ कदम, मुंबई. संजय ओरके, पुलगावं इ. यांच्या प्रमुख उपस्थीतीत घोषित झाले.
देशातील वर्तमान आव्हाने आणि विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या “संघटित व्हा!” या उपदेशानुसार सांगोपांग विचारविनिमय करून या तीनही गटांनी स्वयंप्रेरणेने एकात्रीकरणाचा निर्णय घेतला.
एकत्रीकरणा पूर्वी आठ महिन्यात ३ युनिटच्या चर्चेच्या तीन मोठ्या फेऱ्या (10-10 तासांच्या) व सहा (3-3 तासांच्या) लहान फेऱ्या होऊन अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने व शिस्तबद्धरित्या एकत्रीकरणाची प्रक्रिया पार पाडून देशासमोर व प्रामुख्याने परिवर्तनवादी चळवळींसमोर आदर्श घालून दिला.
एकीकरणाच्या तीन सत्रापैकी पहिल्या सत्रात दलाचे ध्येय व उद्दिष्ट यावर मा. धर्मभूषण बागुल (चाळीसगाव), रमेश जाधव (कोल्हापूर) व धम्मा कांबळे (यवतमाळ) यांनी सखोल मांडणी केली. दुसऱ्या सत्रात संघटनात्मक कार्यपद्धती कशी असावी ह्यावर राजाभाऊ कदम (मुंबई), एड. अभय लोखंडे (वर्धा) व प्रा. डॉ. गुलाबराव राजे (रत्नागिरी) यांनी मांडणी केली तर तिसऱ्या सत्रात एकीकरणाची कार्यपद्धती ह्या विषयावर अध्यक्ष मा. अशोक खन्नाडे यांनी व उपस्थित अनेक मार्शल्सनी मते मांडून नव्या समित्या बनविल्या. नवीन समित्यात इतर गटांना समाविष्ट करता यावे यासाठी काही पदे रिक्त सोडलीत.
“घर तिथे सैनिक व गाव तेथे शाखा” या बरोबरच महाराष्ट्र राज्य व भारतातील सर्व समता सैनिक दल यांना पुढील काळात एकत्र करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एकच समता सैनिक दल निर्माण करण्याचा संकल्प केला आहे
*समता सैनिक दलाच्या पुनर्रचनेचे हे एक महत्वाचे पाऊल असून एकत्रिकरणाने समता सैनिक दलाची शक्ती वाढणार आहे. ही आंबेडकरी आंदोलनासाठी सकारात्मक आणि अत्यंत आनंददायी घटना आहे. या बैठकीत राष्ट्रीय कोअर कमिटी, राष्ट्रीय कार्यकारीणी व राज्य कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यातआली.
समता सैनिक दल हे विश्व भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले मातृसंघटन असून सर्व प्रकारची विषमता नष्ट करून “भारतराष्ट्र” निर्माण, सुरक्षा, व संवर्धन या मिशनसाठी हा एकत्रीकरणाचा संकल्प आहे.
या ऐतिहासिक एकीकरणाचे संयोजन समता सैनिक दलाच्या चाळीसगाव युनिटने केले तर या ऐतिहासिक एकत्रीकरणा करिता तिन्ही ग्रुपचे 96 पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रामाणिक व कटीबद्द असणाऱ्या तसेच अनेक वर्ष समता सैनिक दलाचे काम करणाऱ्या विविध गटांना एकत्र आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार करून, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत