मुख्य पानमुख्यपानराजकीय

औषधे आणि वैद्याकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही : न्यायमूर्ती देवेंद्रकुमार

औषधे आणि वैद्याकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारची ही कृती राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारी असल्याचे ताशेरेही ओढले.

आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यापूर्वी मंजूर केलेला निधी पूर्णपणे का वितरित केला नाही आणि उपलब्ध झालेला निधीही पूर्णपणे का वापरला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला त्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. रुग्णालयांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी केली हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने मृत्युसत्र घडल्याच्या घटनेची दखल घेऊन आणि त्याबाबत चिंता व्यक्त करून न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी वापरला जात नसल्याबाबत मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने या प्रकरणी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले तर, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येणारा निधी पूर्णपणे उपलब्ध केला जात नाही. शिवाय, उपलब्ध करून देण्यात आलेला निधीही पूर्णपणे वापरला जात नसल्याचे दिसून येते यावर न्यायालयाने बोट ठेवले.

औषधे आणि वैद्याकीय उपकरणे खरेदीसाठी मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नसल्याच्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, राज्य सरकारची ही कृती राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारी असल्याचे ताशेरेही ओढले.

आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, यापूर्वी मंजूर केलेला निधी पूर्णपणे का वितरित केला नाही आणि उपलब्ध झालेला निधीही पूर्णपणे का वापरला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला त्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. रुग्णालयांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी केली हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने मृत्युसत्र घडल्याच्या घटनेची दखल घेऊन आणि त्याबाबत चिंता व्यक्त करून न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी वापरला जात नसल्याबाबत मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने या प्रकरणी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले तर, आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येणारा निधी पूर्णपणे उपलब्ध केला जात नाही. शिवाय, उपलब्ध करून देण्यात आलेला निधीही पूर्णपणे वापरला जात नसल्याचे दिसून येते यावर न्यायालयाने बोट ठेवले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!