दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ६ जुलै १९४४ रोजी सिंगापूरहून रेडिओ संदेशातून महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ संबोधले.

1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ६ जुलै १९४४ रोजी सिंगापूरहून रेडिओ संदेशातून महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ संबोधले.
2) रवींद्रनाथ टागोर यांनी ६ एप्रिल १९१५ साली शांतिनिकेतन येथे गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी दिली.
3) ११ मे १८८८ रोजी मुंबईतील कुंभारवाडा सार्वजनिक सभेत विद्याचरण शास्त्री यांनी ज्योतिबा फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी दिली.
4) प्र. के. अत्रे यांना ‘आचार्य’ ही उपाधी वि. स. खांडेकरांनी १९५७ साली पुण्यातील मराठी साहित्य संमेलनात दिली.
5) धोंडो केशव कर्वे यांना ‘महर्षी’ ही उपाधी १९३१ साली पुण्यातील सार्वजनिक सत्कार समारंभात दिली.
6) विठ्ठल रामजी शिंदे यांना ‘महर्षी’ ही उपाधी १९२० साली पुण्यातील अस्पृश्यता निवारण परिषदेत समाजसुधारक सहकाऱ्यांनी दिली.
7) रवींद्रनाथ टागोर यांना ‘गुरुदेव’ ही उपाधी महात्मा गांधींनी त्यांच्या प्रज्ञा व आध्यात्मिकतेचा सन्मान म्हणून दिली.
8) सुभाषबाबू जर्मनीत असताना भारतीय क्रांतिकारक, विशेषतः रासबिहारी बोस व आझाद हिंद सेनेचे सैनिक, यांनी त्यांना ‘नेताजी’ असे प्रेमाने व आदराने संबोधायला सुरुवात केली.
9) १९३९ मध्ये सुभाषबाबूंच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘देशनायक’ असे संबोधले.
10) सरोजिनी नायडू यांना ‘नाईटिंगेल ऑफ इंडिया’ ही उपाधी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९२० साली दिली.
11) चित्तरंजन दास यांना ‘देशबंधू’ ही उपाधी १९२१ मध्ये असहकार चळवळीतील त्यांच्या योगदानामुळे एका सत्कार समारंभात दिली गेली.
12) अशा पद्धतीने वि दा सावरकरांना कोणी आणि केव्हा सर्वप्रथम ‘स्वातंत्र्यवीर’ पदवी दिली याची माहिती सावरकर भक्त देऊ शकतील काय ?🤔JK

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!