महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

1 जानेवारीला भिमा कोरेगावला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची होणारी अडवणूक थांबवा; आर.पी.आय. (आर.के) ची मागणी

या अनुयायांची सेवा सुविधा पुरविण्याची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासन, बार्टी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांची असते. पुणे जिल्हयातील भिमाकोरेगाव येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून विविध राज्यातून १ जानेवारी रोजी लाखों आंबेडकरी अनुयायी येत असतात. मात्र कित्येक वर्षापासून विजयस्तंभास मानवंदना देणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची सुविधेच्या नावाखाली पुणे जिल्हा प्रशासन अडवणूक करीत असून त्यांना वेठीस घरीत आहे. ही अडवणूक थांबवावी अशी मागणी आर पी आय (खरात गट) अध्यक्ष राजाराम खरात यांनी केली आहे.
८ किलो मिटर अंतरा पासून लहान मुले, स्त्रीया व वयोवृध्द यांना पायी चालत यावे लागते. त्यामुळे अनेक लहान मुले, खीया व वयोवृध्द थकतात व आजारी पडतात.मानवंदना देण्यास येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना विजयस्तंभापासून ८ किलो मिटर अंतरावर उतरविले जाते व तिथेच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा विजयस्तंभा पासून पार्किंगची व्यवस्था बसेसचा थांबा १ ते २ किलो मिटरवर करावा, जेणे करून अनुयायांना जाणे येणे सोयीचे होईल. युध्द पातळीवर पुणे जिल्हा प्रशासन बार्टी यांनी सामाजिक न्याय खाते यांनी या गैरसोयीची दखल दखल घ्यावी अशी मागणी राजाराम खरात यांनी केली आहे. परंतु यावेळेस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजनेमधील राखीव असलेल्या ६० लाख रूपये सदर भोजनावर खर्च करणार असल्याचे समजते. मानवंदना देण्यास येणाऱ्या अनुयायांसाठी सेवा सुविधा पुरविण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन बार्टी व सामाजिक न्याय विभाग आपल्या राखीव निधीतून खर्च करीत असतात. सदर खर्च भोजनावर करू नये. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजनेसाठीच तो खर्च करावा अन्यत्र नाही, अन्यत्र खर्च करायचा असल्यास शासनाच्या विशेष खास निधीतून करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!