महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्रातील सरकार सर्वसामान्यांचे आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परळी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात ७४९ कोटींच्या लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकासाला काही कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सरकार सर्वसामान्यांचे आहे. शासन आपल्या दारी असल्याचे हे अभियान आहे. गोर- गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, उपेक्षित, आदिवासी व सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सरकार महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन मान्यवरांनी दर्शन घेतले. यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात क्रमांक एकचे काम झाले. आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यातही बीड जिल्ह्याने क्रमांक एकचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात भरीव निधी दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!