शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही उपमुख्यमंत्री केले वक्तव्य “शेतकन्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच केंद्र सरकारसोबत बैठक घेण्यात येईल. सरकार शेतकन्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी परळीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. सरकारकडून शेतक-यांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहेत. मराठवाड्याला आम्हांला दुष्काळमुक्त करायचे आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांच्या तोंडात आरक्षणाचा पास पातलाय, त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची असल्याचे सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १० लाख महिलांना घरे दिली जात आहेत. आशा वर्कर्सच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. वैद्यनाथ विकासकामांसाठी मी स्वतः पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाऊन आराखडा मंजूर करून आणणार आहे असे ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत