पाखरे घरी परतायला लागली,,,,,,,!


ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
लोकसभा निवडणुकीचे 3 /4 टप्पे पार पडले .प्रत्यक्षात भाजप साठी ब्रह्मदेव असलेले मोदी जी यांनी प्रचारासाठी मुंबई येथे रोड शो केला , त्या साठी मेट्रो बंद ठेऊन मुंबईच्या कामगारांचे लोंढे रोखून धरण्यात आले .
मुंबईच्या रक्त वाहिन्या म्हणून मेट्रो ची गणना केली जाते , बॉम्ब स्फोटात ही मेट्रो थांबली नाही . पण ती मोदी जी यांच्या साठी थांबली .
अचानक माणसे अस्वस्थ झाली ,
अनेक हिरकणी अस्वस्थ झाल्या , घरी माझं बाळ आहे , ते एकटच आहे ,,, मला वाट सोडा म्हणून कासावीस झाल्या , दूध गडाच्या खाली घालून येणाऱ्या हिरकणी ला उशीर झाला , गडाचे दरवाजे बंद झाले , कोणत्याही स्थितीत ते उघडायचे नाहीत म्हणून थेट महाराजांचा आदेश , स्वराज्यासाठी व सुरक्षे साठी तो आवश्यक ही ,,,
पण आई ची माया थांबली नाही , रात्रीच्या अंधारात ती बुरुज चढून गेली ,,,,
कातळा ने ही आई ची ममता जाणली , आणि जिथे बोट रुत्वायला ही जागा नव्हती तिथे तो अलगदपणे सरकला ,,,,, पाषाण हृदयाला ही पाझर फुटला तो इतिहास ,,,
महाराजांनी त्या माऊली चां सत्कार केला , साडी चोळी दिली , आणि आठवण सदोदित रहावी म्हणून नाव ही दिलं “हिरकणी “
आईची ममता जाणणारे , महाराज त्या काळी होते , पर स्त्रिया माते समान मानणारे छत्रपती होते ,,, पण काळ बदलला
राजे ही बुभिक्षित नजरेने परदेशातील पाहुण्या महीले कडे पाहू लागले , त्यांच्या हातात हात देण्या साठी उतावीळ झाले , पण अगदी पाच्छिमात्य स्त्रिया मध्ये ही तेच स्त्रीत्व असते त्यांनी स्वतः हुन स्वतः ला वाचवलं ,
पण देशातील असंख्य महिला त्यांच्या सरदाराच्या वासनेच्या बळी पडल्या , सत्ता माणसांना मग्रूर आणि वासनांध बनवते , यातून च अनेक हिरे असेच पैदा झाले , कांहीं नी तर मर्यादा चे ही उल्लंघन केले , 4000महिलांचे लैंगिक शोषण करून त्याच्या ब्ल्यू फिल्म बनवणारे प्रज्वल रेवण्णा ही तयार झाले .
त्यांच्या प्रचाराला आधुनिक महाराज गेले ,, असा हा सारा मामला
आम्ही च फक्त देश भक्त , बाकीचे देश द्रोही ,, म्हणात म्हणत स्वातंत्र्याचा इतिहास नसलेल्या नी उर बडवून देश प्रेमाची नाटके केली ,
इतिहासातील राजवटी आणि यातील युद्धाच्या यातनामय कहाण्या त्यांनी जीवंत केल्या त्या आधारे माणसांचे मेंदू हायज्यक केले ,
सगळे पक्ष भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले , आणि भ्रष्टाचार मुक्त भारत बनवण्या साठी ऑपरेशन सुरू केले
” आमचा “डी एन ए ” विस्थापितांचां आहे आणि त्या आधारे आम्ही पक्ष उभा करू म्हणत म्हणत , प्रस्थापितांच्या साठी “दिंडी दरवाजे ” त्यांनी उघडे केले ,
त्यांचे साठी मेण्या पालख्या धाडल्या ,,
जे बसण्यास नकार देत होते त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना तुरुंगात सडण्यास पाठवले ,
पण ही त्यांची कृती फक्त भीती प्रस्थापित करण्या साठी होती ,
कांहीं जण चतुर होते त्यांनी अगोदरच रागरंग ओळखला , आपली आणि आपल्या कुटुंबाची वर्णी तेथे लागू नये म्हणून त्यांनी त्यांचे गोटात जाण्याची प्रस्थानाची तयारी ठेवली .
आपल्या राजाला सोडून आपण जात आहोत याची जाण राजाला ही होती आणि त्यांना ही होती
“ओलीस ” म्हणून ते चालले होते
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही , त्यात ही केंद्रीय सत्ते पुढे ,,, ज्या सत्तेचे अनाजी पंत महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांच्या सभोवती एक पिलावळ आहे , जी आरोप करण्यात आणि गदारोळ उठवण्यात माहिर आहे .
तोच महाराष्ट्र होता व आहे जिथे कात्रज चां धडा सगळ्यांना ज्ञात होता , तो अंगीकारणे आवश्यक होते .
अगदी खर वाटावं म्हणून ते लढ म्हणले तरी लढायचे , हे त्यांनी ठरवलं होत , यातून त्यांनी आपल्या जागा फिक्स केल्या , त्यावर ज्यांना शक्य ते लढण्यासाठी उभे राहिले , कांहीं नी आपल्या धर्म पत्नीला उभे केले ,
रात्री ही खजिना चालू ठेऊन दिल्लीतून आलेली रसद गोरगरीब जनतेला वाटून टाकली ,
कांहीं नी अर्ध्यातून लढाईतून माघार घेतली , लोकांना वाटले जरांगे नावाच्या तोफेचा धसका त्यांनी घेतला असेल ,,,! पण तस नव्हतं , तो असा वीर होता जो महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चालू असताना बेळगाव ला वेष पालटून गेला होता .
साधा भोळा दिसणारा लंके नावाचा योद्धा सत्तेच्या गोटातून चालता होऊन नगरची खिंड लढवत होता ,
तर बारामती चे बुरुजावर प्रहार करणाऱ्या फलटण चे सरदाराच्या विरोधात सत्तेच्या गोटात स्थिरावलेल्या जुन्या मात्तबर अकलूज चे लढवय्या ला आपल्या गोटात आणून युद्ध मोहिमे वर तुंबळ युद्ध लढण्यास उद्युक्त केले होते .
राज निष्ठा असलेलं हे घराणे पण युवराजा शी झालेल्या विसंवदातून तिकडे गेलेले
या साऱ्यांना एका छता खाली आणलेच होते ,
आत्ता गरज होती ती , मूळ युवराज आणि त्यांच्या सोबत गेलेले सरदार आणण्याची ,
तस तर युवराजानी ही आपल्या गोटाला फारशी क्षती पोहचवली नव्हतीच ,,,,,
आमचा संचार हा सगळी कडे असतो , म्हणून गोपनीय मधील गोपनीय बाबी ही आम्हाला ज्ञात असतात ,
पण आणि पडलो राज निष्ठ ,,,, म्हणून या गोपनीयतेचां भंग आम्ही सहसा करत नाही ,
युवराजांच्या प्रेमाखातर त्यांच्या आगमनाच्या स्वागता साठी पूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजधानी तील एकाने सकाळी बॅनर लावले , आमच्या युवराजानें त्यांना सांगितले , तुम्ही राजेंच्या गोटात रहा , आपले राजे वयोवृध्द आहेत , इतकं ही खिंडार पाडू नका की पुन्हा बुजवणे अवघड जाईल ,
लगेच ती आज्ञा प्रमाण मानून ते बॅनर काढले गेले ,,,,,
असे आमचे युवराज , ऐन मोक्याच्या वेळी आजारी पडतात , तसे ते या ही वेळेस आजारी पडले ,,,,, त्यांचा घसा खवखवतो अस थेट राजाने च सांगितले , त्यांनी ही ब्रम्ह देवा कडे पाठ फिरवली ,
कदाचित् आत्ता अजून जातील , त्यांचा झेलकरी यांनी तस् सांगितल आहे ,, पूर्वी हे झेलकरी फुले शाहू आंबेडकर वाद सांगायचे , वक्तृत्व हेच त्यांच्या उप जिविकेचे साधन , आमच्या युवराजा नी थेट त्यांना सरदारकी ची वस्त्रे दिली ,,, तसे आमचे युवराज हे भावनिक आणि हळवे ही आहेत , लोकांना उगाच ते रागीट वाटतात ,
आम्हाला आमच्या युवराजांचां राग येत नाही ,, ते ही आम्हाला लाडके आहेत ,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राला चीटकवलेली अनेक गुरू आणि प्रशिक्षकांची बांड गुळे त्यांनी लीलया कापून टाकली आहेत , तेंव्हा पासून ते आम्हाला भावले ते आज तागायात ,,,
उन्मत्त झालेल्या दिल्ली चे तख्तधिश आणि त्यांच्या पक्षाला ही कळू द्या ,,,,
हा महाराष्ट्र आहे ,
माणसांचे हात पाय बांधून तुम्ही कांहीं काळ मजबूर कराल ही पण तुम्ही आमच्याच शक्तीचा वापर आमच्याच विरोधात करण्याचे हत्यार म्हणून पाहत असाल तर तुम्हाला कात्रज चा घाट हा दाखवावाच लागेल ,,,,,
आमचे युवराज एकदा म्हणाले होते ,,,
“मी शिट्टी मारली तर 50म्होरके पुन्हा माघारी फिरतील ,,,,, !
दुसऱ्याच्या पोरांना घरात आणून गोपाळ पुर झाल्याचे दर्शवता येते पण ते टिकाऊ व शाश्वत नसते ,
त्या साठी स्वतः ची पोर असावी लागतात ,,,,,
“कावळ्याच्या घरट्यात कोकीळे ने अंडी घातली , व त्यातून पिल्ले ही निपजली तरी ते कावळे होत नाहीत ते कोकीळ च राहतात “
भाजप चे देश भरातील कावळ्यांनी हे जाणून असावे ,
कावळ्यांनी , जाती धर्म व त्यांच्या तील वितुष्ठाची विष्ठा चिवडन्याचे त्यांचे कार्य चालू ठेवावे
आम्ही कोकीळ बनून सुरेल आवाजात माणुसकी आणि बंधुता याची गाणी गात राहू ,,, !
आमची पाखरे शहाणी आहेत ,,, ती परतत आहेत ,,, याचा आनंद आम्हाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत