“बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या” ; राऊतांच्या वक्तव्यावर अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं …”

विधानसभा निवडणूक निकालावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हवी, अशी मागणी राऊतांनी केली. राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं आहे? हे संजय राऊत यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पाहावं. येत्या २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकीतही संजय राऊत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतील, असा टोला अनिल पाटलांनी लगावला. ते नाशिक येथे ‘एनआयए’ वृत्तसंस्थेशी बोलत होते.
राऊतांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अनिल पाटील म्हणाले, “जेव्हा एखाद्या पक्षाचा पराभव होतो. तेव्हा जनतेचा जनादेश स्वीकारायला हवा. संजय राऊतांना काहीही कामं नाहीत. संजय राऊतांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जावं आणि भाजपाचे सर्वेसर्वा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम बघावं. राजकारण बाजूला ठेवून त्याकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, लोक कोणाबरोबर आहेत. जेव्हा जेव्हा लोक भाजपा किंवा एनडीए आघाडीबरोबर उभे राहतील, तेव्हा तेव्हा संजय राऊतांचा हा आरोप कायम राहील.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत