“आपका क्या होका कालिया …”, संजय राऊतांचं विधान चर्चेत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. “महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवेसनेच्या बाबतीत झालं होतं, मोदींची लाट आल्यानंतर शिवसेनेसोबतची युती तोडली. आता भाजपाला पुन्हा लाट दिसत आहे, त्यामुळे मला चिंता आहे की सरकारसोबत जे बसले आहेत त्यांचं काय होणार. आपका क्या होका कालिया असा सवाल आहे. परंतु, काँग्रेससोबत आमचं नातं होतं तसं आहे. दिल्ली स्तरावर आमचं बोलणं सुरू आहे. महाराष्ट्रात त्यापद्धतीने जागावाटप केलं जाईल”, असंही राऊतांनी पुढे स्पष्ट केलं.
राज्यावर समाधान मानावं लागलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळवण्याची पूर्ण संधी होती. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या मताधिक्क्याने भाजपावर विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसचा हाच करिष्मा पुन्हा मध्य प्रदेशात होण्याची शक्यता होती. परंतु, काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
“कोणाची सत्ता मोठी आहे, कोणाचा आरोप मोठा आहे, कोणाची पॉवर मोठी आहे, हा आमचा प्रश्न नाही. कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी मजबुतीने उभी आहे. ६ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक खर्गेच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत होत आहे. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेही दिल्लीत सहभागी होणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“इंडिया आघाडीतील आमच्या काही मित्रपक्षांची पाच राज्याबाबत काही मते आहेत. खासकरून काँग्रेससारखा मोठा पक्ष असतो तेव्हा त्या राज्यातील लहान-लहान घटकांना विश्वासात घेतलं जात नाही. आघाडी पुढे घेऊन जायची असती तेव्हा पक्ष लहान असो वा मोठा सर्वांना सोबत घेऊन गेले असते तर कदाचित चांगला फायदा होऊ शकला असता”, असं संजय राऊत म्हणाले. मध्य प्रदेशात काँग्रेसने घटकपक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. तसाच, काहीसा दावा आता संजय राऊतांनीही केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत