महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

गुलाबराव पाटीलांनी संजय राउतांच्या विधानावर दिले प्रत्यूत्तर

 “मनोज जरांगे पाटील सगळीकडे सभा घेत आहेत. ओबीसीच्या नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्रे देणार असं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनात अटकेची भीती येऊ नये”, असं आश्वासन गुलाबराव पाटलांनी दिलं. राऊतांच्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं की, राऊतांना कामं नाहीयत. ते सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांचं कामच आहे बोंबलायचं.

असं संजय राऊत म्हणाले होते की “मराठा आरक्षणावरून राज्यात घमासान सुरू आहे. काही दिवासंपूर्वी बीडमध्ये हिंसाचार झाला होता. आमदारांची घरे जाळण्यात आली होती. यामागे मराठा समाजातील आंदोलकांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. तर, येत्या दिवसांत काहीही होऊ शकतं.”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!