देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

राजकिय डावपेचासाठी न्याय व्यवस्थेचा वापर हे लोकशाहीसाठी व न्यायव्यवस्थेवरील विश्वासार्हते साठी अत्यंत हानीकारक – देशातील ६०० ज्येष्ठ वकिलांचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र.

नवी दिल्ली: न्यायालय हे कायम लोकशाहीचे केंद्र असली पाहिजेत आणि या न्यायव्यवस्थेवर छूप्या पध्दतीने कोणी हल्ले करतअसेल तर ते खपवून न घेता त्याविषयी आवाज उठवला पाहिजे या भावनेतून देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्यासह ६००हून अधिक ज्येष्ठ वकिलांनी न्या. चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात, न्यायालयीन अखंडता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, उज्ज्वला पवार, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उदय होला आणि स्वरूपमा चतुर्वेदी आदींचा पत्र लिहिणाऱ्यांत समावेश आहे.

न्यायव्यवस्था धोक्यात असून राजकीय आणि व्यावसायिक दबावापासून या व्यवस्थेचे संरक्षण करणे आवश्यक आहे, अशी भीती व्यक्त करतानाच एक विशिष्ट गट न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे पत्र लिहिले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!