धुक्यामुळे रेल्वेला ४० मिनिटे झाला विलंब त्यामूळे नोकरदार, व्यावसायिकांची झाली अवकळा.

शुक्रवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी, त्याचा फटका नोकरदार, व्यावसायिकांना बसला.
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ विभागात पहाटे दाट धुके पडल्याने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वेमार्ग दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे मुंबईसह इतर सर्व विभागांतील रेल्वे कमी वेगाने धावत होत्या. तर, मुंबई महानगरातील लोकल पहाटेपासून ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारी २ वाजतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ होती. इतर विभागातून मुंबई उपनगरीय मार्गावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने अनेक लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या होत्या. तसेच अनेक लोकल उशिराने धावत होत्या.
‘पहाटेच्या धुक्यामुळे १० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या’, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
© 2023 All Rights Reserved. Powered by Summit
4कर्जत-खोपोलीदरम्यान प्रवास जलदगतीने होण्यासाठी लोकलचा वेग वाढवण्यात येणार ताशी 90 किमी.
कर्जत-खोपोलीदरम्यान प्रवास जलदगतीने होण्यासाठी लोकलचा वेग वाढवण्यात येणार आहे. सध्या ताशी ६० किमी वेगाने धावणारी लोकल लवकरच ताशी ९० किमीच्या वेगाने धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
मध्य रेल्वेने नुकताच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल आणि ट्रान्स हार्बर ठाणे – वाशी आणि ठाणे – पनवेल मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून ताशी १०० ते १०५ किमी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासातील १० मिनिटांची बचत होईल. आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत – खोपोली मार्गावरील लोकलची वेगमर्यादा ताशी ६० किमीवरून ताशी ९० किमी करण्यात येणार आहे.
वेगमर्यादेत वाढ करण्यासाठी पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत