सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं निधी उभारण्यासाठीच्या प्रस्तावांना मंजुरी.

सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वातल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेनं २ लाख २३ हजार रुपयांचा निधी उभारण्यासाठीच्या प्रस्तावांना काल मंजुरी दिली. यापैकी ९८ टक्के निधी स्थानिक उद्योगांमधूनच उभारण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली.
यामुळे आत्मनिर्भरतेचं ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेनं भारतीय संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळेल, असंही मंत्रालयानं नमूद केलं. स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया २०२० मध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय परिषदेनं घेतला आहे, असं मंत्रालयानं सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत