अजित पवारांच्या “मी बारमतीतून निवडणूक लढवणारच” या वाक्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.”
आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १ डिसेंबर ) कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक मंथन शिबिरात ही घोषणा केला. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. यावरून खासदार सुप्रिसा सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत