
क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाने केलेला पराभव श्रीलंकंन (India vs Sri Lanka) क्रीडामंत्र्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी टोकाचं पाऊल उचलत, अख्खा क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी पराभव, त्यातच विश्वचषकातून बाहेर पडल्याने, श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचललं. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेंने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात श्रीलंकेने केवळ 2 विजय मिळवले.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण आता त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत