बौद्ध धम्माचे अनुपालन केल्यास मानवी जीवन सुखी होईल:– प्रबुद्ध साठे

पेनूर (सोलापूर) — बौद्ध धम्म हाच मानवी संस्कार व संस्कृती असून बौद्ध धम्माचे अनुपालन केल्यास मानवी जीवन सुखी होईल असे प्रतिपादन भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी केले, ते सोलापूर जिल्ह्यातील पेनूर येथे बौद्ध धम्मातील माघ पौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात धम्म प्रवचन देताना बोलत होते, त्रिसरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, व दहा पारमिता पालन केले तर आपल्या जीवनात सुख, शांती, आनंद, समाधान, परिवर्तन येवू शकते, बौद्ध धम्मानुसार आपल्या कुटुंबाचे, समाजाचे सांस्कृतिक परिवर्तन झाले तर बौद्ध भारताचे पुर्ननिर्माण होईल, धम्म व राजकारण वेगळ्या गोष्टी नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असून बौद्ध धम्म वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येणार नाही असेही प्रबुद्ध साठे यांनी सांगितले, याप्रसंगी धम्म जागृती मंचचे मिलिंद मिसाळ, , संतोष बनसोडे, ज्ञानेश्वर गायकवाड, मोहन भोसले सर, गाडे सर, इत्यादी मान्यवर , महीला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, वंदनीय भन्तेजी उपाली यांनी धम्म देसना दिली, या सुंदर व परिवर्तन वादी कार्यक्रमाचे आयोजन माननीय काकासाहेब आवारे साहेब यांनी केले होते, विशेष बाब म्हणजे याप्रसंगी प्रबुद्ध साठे व भन्तेजी उपाली यांच्या हस्ते बोधी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत