महाराष्ट्रमुख्यपान

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले धोके व इशारे खरे ठरू लागल्यामुळे संविधानाच्या समर्थकांनी संविधान विरोधकांना रोखण्यासाठी काम करावे लागेल….

  • आयु. एस. के. भंडारे (भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष)

मुंबई -भारतीय संविधान निर्मितीचा आलेख व त्याची मान्यताच्या वेळी दि 25/11/1949 रोजी संविधानाचे शिल्पकार व संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या समोरोपिय भाषणात
सांगितलेल्या मार्गाप्रमाणे काम न करता त्याउलट दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याप्रमाणे काही सत्ताधारी, काही राजकीय पक्ष काम करत असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य व भारतीय संविधान धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन संविधानाच्या लाभार्थ्यांनी- संविधानाच्या समर्थकांनी केवळ संविधान दिनाच्या शुभेच्छा न देता संविधान विरोधकांना रोखण्यासाठी काम करावे लागेल असे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी आयबीसेफ व समस्त बहुजन -मागासवर्गीय संघटनांच्यावतीने आझाद मैदान ,मुंबई येथे संविधान दिनी दि.26/11/2023 रोजी बहुजन – मागासवर्गीयांच्या 22 प्रश्न – मागण्यांसाठी आयोजित केलेल्या महा जनआक्रोश आंदोलनाच्या वेळी समाज माध्यमांना सांगितले.एस के भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धोक्याचे 12 इशारे पुढीलप्रमाणे आहेत-
1) संविधान कितीही चांगले असो ,ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ,ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरविल्या शिवाय राहणार नाही …

2)संविधानिक मार्गाचा अवलंब न करता क्रांतिकारी मार्गाचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो ते अपयशी होईल …

3)जर पक्षांनी स्वतः च्या तत्व प्रणालीला देशा पेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य ..धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल .या संभाव्यतेविरुद्ध लढण्याची आपण कटिबद्ध व्हायला हवे ,आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.

4) जर प्रचंड बहुमत असेल तर हुकूमशाहीची शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे.

5)प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी ,आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संविधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना आपण दूर ठेवले पाहिजे.

6)जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा-
” लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्यांच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी उपयोग करील “

7)आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी समर्पकपणे म्हणल्याप्रमाणे – ” कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही…”

8)”… राजकारणात भक्त किंवा व्यक्ती पूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.”

9)” …राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे, राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही …सामाजिक लोकशाही म्हणजे- तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता यांना जिवनतत्वे म्हणून मान्यता देतो..

10) सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारात राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे, अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते..ही निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील …

11)भारतात जाती आहेत, जाती या राष्ट्र विरोधी आहेत … त्या समाज जीवनात विभागणी करतात त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यावर आम्ही मात केलीच पाहिजे…

12) राष्ट्रनिर्मितीनंतरच बंधुत्व वास्तवात पाहायला मिळेल,बंधुत्वशिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ बाह्य देखावा असेल.
शेवटी संविधान विरोधकांना मतदान करायचे नाही यासाठी अभियान राबविले जाणार असल्याचे एस के भंडारे यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

2 Comments

  1. अतिशय अभ्यासपूर्ण व मार्मिक लेख. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!