कायदे विषयकदिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग १

समाज माध्यमातून साभार

बुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार अरिय सत्य असून अरिय अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाण पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले.

बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव “उरुवेला” होते व ते नेरंजना नदी किनारी वसले होते. आता या नदीचे नाव फाल्गु झाले आहे. साधारणतः इ. स. पूर्व २५० मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या ११व्या वर्षी येथे येऊन येथील “बोधीवृक्षाला” वंदन केले होते. या जागेचे पावित्र्य ओळखून अशोकाने येथे १,००,००० सोन्याच्या मोहरा दान देऊन विहार बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर येथील बोधीवृक्षाचे योग्य जतन व्हावे यासाठी त्याच्या भोवती १० फूट उंच भिंत देखील बांधली.

भ.बुद्धांना ज्याठिकाणी ध्यान करून बुद्धत्त्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते वज्रासन बनवले. मुख्य विहाराच्या जवळ, पूर्वेकडे भ. बुद्धांनी ‘चंक्रमण’ केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकाने २२ कोरीव दगड ठेवले व प्रत्येकावर धम्मलिपि मध्ये अ ते ट हा अक्षरे कोरून ठेवली. अशोकाने केलेल्या या सर्व कामाचा उल्लेख त्याच्या ८व्या शिलालेख, सांची स्तूप क्र.१ च्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात.

भाग २

१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले. उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महावि�#महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग १
बुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार अरिय सत्य असून अरिय अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाण पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले.

बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव “उरुवेला” होते व ते नेरंजना नदी किनारी वसले होते. आता या नदीचे नाव फाल्गु झाले आहे. साधारणतः इ. स. पूर्व २५० मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या ११व्या वर्षी येथे येऊन येथील “बोधीवृक्षाला” वंदन केले होते. या जागेचे पावित्र्य ओळखून अशोकाने येथे १,००,००० सोन्याच्या मोहरा दान देऊन विहार बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर येथील बोधीवृक्षाचे योग्य जतन व्हावे यासाठी त्याच्या भोवती १० फूट उंच भिंत देखील बांधली.

भ.बुद्धांना ज्याठिकाणी ध्यान करून बुद्धत्त्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते वज्रासन बनवले. मुख्य विहाराच्या जवळ, पूर्वेकडे भ. बुद्धांनी ‘चंक्रमण’ केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकाने २२ कोरीव दगड ठेवले व प्रत्येकावर धम्मलिपि मध्ये अ ते ट हा अक्षरे कोरून ठेवली. अशोकाने केलेल्या या सर्व कामाचा उल्लेख त्याच्या ८व्या शिलालेख, सांची स्तूप क्र.१ च्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात.

भाग २

१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले. उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले.

सिंहली भिक्खू बोधिरक्षित यांच्या शिलालेखांवरून कळते कि या महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिंहली भिक्खू चुल्ल तिस्स यांनी इ.स.पूर्व १०० मध्ये दिली होती.

वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेली सोन्याची व चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येते कि इ.स.१४० मध्ये कनिष्काचा मुलगा राजा हुविष्का याने या महाविहाराचा जिर्णोद्धार केला. वज्रासनाच्या व भ.बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी इंडो स्किथियन शिलालेख याची खात्री देते.

इ.स. ३९९ – ४०९ दरम्यान फा हियान या चिनी बौद्ध भिक्खूने महाविहाराला दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. यात त्याने महाविहाराच्या परिसराचे तपशीलवार वर्णन केले आहे.

सोने आणि रत्नजडित वस्तू ज्या वज्रासनाच्या खाली सापडले असून ते सध्या ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहेत.
इ.स. ४थ्या शतकाच्या पूर्वार्धात, श्रीलंकेचा राजा मेघवन याचा भाऊ बुद्धगयेला आला असता, त्याला राहण्यासाठी ठिकाण सापडले नाही. आपल्या भावाला सांगितल्यावर, मेघवन ने बुद्धगया येथे मुख्य महाविहाराच्या पूर्वेला एक महाबोधी विहार बांधले जेथे सर्वांना प्रवेश होता. या विहाराच्या दारावर एक पितळी धातूपट्टी होती ज्यावर लिहिले होते, “प्रत्येकाला, कोणत्याही अटींशिवाय मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ विचार होय”. कालांतराने हे विहार एक महत्त्वाचे बौद्ध विद्यापीठ झाले ज्याचा शैक्षणिक स्तर नालंदा किंवा विक्रमशिला सारखा होता.

हुयान त्सांग ने याचे वर्णन करताना म्हटले आहे कि यात सहा मोठी विहारे, तीन मजली टेहळणी बुरुज व संपूर्ण विहाराला सुरक्षेसाठी चाळीस फूट उंच भिंत होती. आतमध्ये भ.बुद्धांची सोनं व चांदीची मूर्ती होती व ती रत्नजडित होती. त्याकाळी तेथे जवळपास १००० भिक्खूंचे वास्तव्य होते. याच विहारात जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी “अठ्ठसालिनि” व “ज्ञानोदय” (जो आता नष्ट झालाय) लिहिला. चिं हुन, हुआन चाऊ, धर्मपाला (माध्यमकाचतुःसटिका चे लेखक) आणि रत्नवज्रा हे काही प्रसिद्ध भिक्खू याच विहारात होऊन गेले. येथे उत्खनन करताना, कनिंघम यांना या विहाराचा परिसर २००० फूट लांब व १००० फूट रुंद दिसला व त्याची भिंत ९ फूट जाड होती. हे महाबोधी विहार १३व्या शतकापर्यंत सुरु होते, नंतर ते लयाला गेले. आजही त्याचे उरले सुरले अवशेष पाहायला मिळतात.

भाग ३

इ.स ६०० च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. ६२० मध्ये बोधीवृक्षाभोवती २४ फूट उंचीची भिंत बांधली.

इ.स. ६३७ मध्ये हुयान त्सांग ने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळी ब्रह्मदेशाचा राजा साडो याने बांधला होता. हुयान त्सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गु (नेरंजना) नदीला पूर आला होता व त्

याचे पाणी व वाळू संपूर्ण महाविहार परिसरात पसरली होती. महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार १७० फूट उंच होते व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते. महाविहाराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी कोनाडे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेली बुद्धमूर्ती ठेवल्या होत्या. महाविहाराच्या पूर्वेला की तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्याचांदीने सजवलेली कलाकुसर होती. महाविहाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रयाच्या १० फूट उंच मूर्ती होत्या. बोधीवृक्षाच्या भोवती उंच भिंत होती.

बुद्धांच्या बुद्धगये येथील ७ आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी ध्यानमग्नतेत व्यतीत केलेल्या साठी ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव स्मृतिस्थळ बांधल्या होत्या. या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली ज्यात सुजाताने बुद्धांना ज्याठिकाणी खीर दिली, कश्यप बंधूंनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व मातीपोसक जातकाचे ठिकाण सामील होते.

हे सर्व स्तूप १८व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. नंतर महंतांच्या अलिखित सूचनेनुसार (हे सविस्तर नंतर येणार आहे), तेथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. कनिंघम ला नंतर उत्खनन करताना लाखेच्या अनेक मूर्ती सापडल्या.

महाबोधी महाविहाराचे संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि असंख्य अनामिक दानदात्यांनी केले. त्याकाळी महाविहार भोवती जे नक्षीदार कुंपण अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख कोरून ठेवले. एका शिलालेखात एका दानदात्याने २५० दिनार (गुप्तकालीन सोन्याचे नाणे) दान दिले. त्याचबरोबर महाविहार रोज दीप पूजनाच्या तुपासाठी ३०० गाय महाविहाराला दान दिल्याचे दिसते.

७व्या शतकाच्या सुमारास इ त्सिंग ने महाबोधी महाविहास भेट दिल्याचे कळते. त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या स्वरंक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावे दान दिला होती.

भाग ४

१०व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाबोधी महाविहाराला श्रीलंका, चीन आणि तिबेट वरून अनेक बौद्ध भिक्खू भेट देण्यासाठी येऊ लागले. इ.स ९६४ मध्ये ३०० पेक्षा जास्त भिक्खू चीन मधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते. चीन सम्राट ताई त्सुन्ग (इ.स. ९७६-९९७) ने बोधीवृक्षा खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिले होते.

महाबोधी महाविहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाणाऱ्या जिण्याकडच्या वरच्या बाजूस भ.बुद्धांची एक भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे. तिच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रेयच्या मूर्ती आहेत. तेथील शिलालेख वरून कळते कि हि मूर्ती भिक्खू वीरेंद्र ने १०व्या शतकात दान दिली होती.

इ.स. १०३५ ते १०७९ दरम्यान, ब्रह्मदेशाच्या राजाने महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी प्रचंड दान दिले होते. चिनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथील एका दगडावर सापडला ज्यावर भ.बुद्धांच्या सात मूर्ती कोरल्या आहेत. सध्या हा दगड इंडियन म्युझियम, कोलकत्ता येथे पाहायला मिळतो.

इ.स. १०११ मध्ये दीपंकर श्रीजना (ज्यांना प्रामुख्याने अतिसा या नावाने ओळखले जाते) यांची दीक्षा येथेच झाली. येथील मतविहारात २ वर्षे राहून त्यांनी बौद्ध आचार्य सिलरक्षिता यांच्याकडून विनय शिकून घेतला.

११ व्या शतकाच्या पूर्वार्धात महाबोधी महाविहाराला पुन्हा डागडुजीची गरज भासली. त्यावेळेस ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा (इ.स १०८४-१११३) यांनी जहाज भरून सोने, चांदी, मौल्यवान जडजवाहीर बुद्धगयेत पाठवून दिले. ११व्या शतकातील एका शिलालेखाद्वारा ही माहिती मिळते..

महाबोधी महाविहाराच्या पूर्वे कंदील सज्जात भ. बुद्धांची मूर्ती जी भिक्खू वीरेंद्र यांनी दान दिली होती.
इ.स. १२३० मध्ये, शिवलिकचा राजा अशोकवल्ला याने त्याचे गुरु पंडित मुशाला आणि चट्टोपादि यांच्या सांगण्या वरून येथे एक विहार बांधले. त्याच दरम्यान कामराज चा राजा पुरुषोत्तमसिंह याने आपल्या नातवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक विहार बुद्धगयेत बांधले. बांधकामाच्या देखरेखीसाठी राजाने भिक्खू धर्मरक्षित यांची नेमणूक केली होती. सर कनिंघम यांना सापडलेल्या एका शिलालेखात ही माहिती मिळते.

भाग ५

बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देणे जगातील बौद्ध राष्ट्रातील सर्वच लोकांना जमणारे नव्हते. साधनांची कमतरता, प्रतिकूल प्रवास आणि त्याच बरोबर भारतातील मुस्लिम राज्य व त्यामुळे उद्भवलेली युद्धयजन्य परिस्थिती या मुळे बुद्धगया येथील लोकांचा ओढा कमी झाला. यावर मात करण्यासाठी अनेक बौद्ध देशातील राजांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची मोजमाप घेऊन आपल्या राज्यात महाबोधी महाविहाराची प्रतिकृती करण्यास सुरुवात केली.

ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा यांनी काही खास कारागार बुद्धगयेला पाठून महाबोधी महाव

आल्या. काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष अशी:

बिपीन बिहारी बॅनर्जी, महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक – या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो. मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पहिली आहे. नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कापड गुंडाळलेले पहिले तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता व तेथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला. यापूर्वी कधीही कोणीही ब्राह्मण येथे पूजा करायला येत नसे.

महातली सुमंगला, सिंहली बौद्ध भिक्खू – धम्मपालांबरोबर त्यादिवशी महाविहारात होतो जेव्हा महंतांच्या लोकांनी बुद्धमूर्ती काढून घेतली. त्यावेळेस आम्ही कुठलाही प्रतिकार केला नाही मात्र ही जपानवरून आलेली मूर्ती असून तिचा सन्मान करणे योग्य आहे असे म्हटले. त्यावेळेस काही लोकं धम्मपालवर धावून गेली.

डॉ. हरी दास चॅटर्जी, गया मधील डॉक्टर – १८७३ मध्ये मी पहिल्यांदा महाबोधी महाविहार पहिले. नंतर त्याची डागडुजी झाल्यानंतर देखील पहिले. मी तेथे केवळ बौद्ध लोकं व भिक्खू येताना पहिले आहेत. ते तेथे मेणबत्ती व धूप जाळतात. तेथे कोणी हिंदू कधीच जात नाही.

बाबू दुर्गा शंकर भट्टाचार्य, जमीनदार – मी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अनेकवेळा पहिले आहे. तेथे बुद्धमूर्ती जवळ अनेक बौद्ध कपडे, पैसे दान देताना पहिले आहे. सध्याच्या महंताने बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दान दिलेले अनेक सोन्या चांदीच्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्या आहेत हे मला महंतांच्या एका शिष्यानेच सांगितले व जेथे ठेवल्या ती खोली देखील दाखवली आहे.

पंडित गंगाधर शास्त्री, मुख्याध्यापक ज़िल्हा शाळा, गया – महाबोधी महाविहार हे बौद्धांचे स्थान आहे, हिंदूंचे नव्हे. मी हे महाविहार फक्त बाहेरून पहिले आहे कारण माझे धर्मशास्त्र मला तेथे जायला परवानगी देत नाही. तेथे गेलो तर मला प्रायश्चित घ्यावे लागेल.

आपल्या १०२ पानांच्या निकालपत्रात डी.जे. मॅकफेरसन यांनी जयपाल गिरी, महेंद्र गिरी, बिमल देव गिरी आणि आणखीन दोघे जणांना IPC च्या कलम २९५, २९६ आणि २९७ अन्वये दोषी धरत प्रत्येकाला १ महिना साधी कारावास व रुपये १०० दंड दिला. हा खटला खूप गाजला. न्यायालयातील साक्षी दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक अधोरेखित झाले कि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच असून तेथे हिंदू महंताने अनधिकृत कबजा मिळवला आहे.

महंताने गया कोर्टाच्या विरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केले जेथे ही शिक्षा रद्द करण्यात आली. अनागरिक धम्मपालांना मोठा मनस्ताप झाला.

जेव्हा लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय झाले तेव्हा त्यांना बर्मी लोकांच्या शिष्टमंडळाने बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार महंताच्या ताब्यातून सोडवून बौद्धांकडे सोपवण्याची विनंती केली. या प्रकरणात कर्झन यांनी लक्ष घालून, १९०३ मध्ये बुद्धगया येथे आले. यावेळेस महंत त्यांना भेटण्यास आला. कर्झन यांनी त्याला विचारले कि तो हिंदू असूनही बुद्धविहारावर कब्जा का केला आहे, काय तो बुद्धांची पूजा करतो आहे? महंत म्हणाला कि बुद्धांना तो विष्णूचा अवतार मानतो. यावर कर्झन म्हणाले तू तर शैव पंथीय आहेस, वैष्णव नाहीस, यावर महंत निरुत्तर झाला. कर्झन यांची खात्री पटली कि म्हटलं केवळ महाबोधी महाविहारावर ताबा मिळवायचा आहे. मात्र यात जास्त घाई करूनही चालणार नव्हते हे कर्झन ओळखून होता.

अनागरिक धम्मपाल यांनी पुरोगामी हिंदूंची मने वळविण्यास सुरु केले. 1922 साली गया येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात महाबोधी सोसायटी तर्फे महाविहाराच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका वाटली व महाविहाराच्या ताब्यासंबंधी मागणी केली. बर्मी शिष्टमंडळाने देखील आग्रहाची मागणी केली (बर्मा देश त्यावेळेस भारताचा भाग होता). अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. तिचे प्रमुख राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आले. आणखी एक सदस्य होते ज्यांचे नाव स्वामी रामोदार दास होते. त्यांनी नंतर बौद्ध धम्म स्वीकारला व राहुल सांकृत्यायन म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.

१९२५ साली समितीने अखिल भारतीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा असे ठरले. त्यानुसार हिंदू महासभेच्या ४००० सदस्यांपुढे धम्मपाल यांनी आपली भूमिका मांडली. या परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला तो म्हणजे महाबोधी महाविहारात पूजेचा संपूर्ण हक्क बौद्धांना देण्यात यावा व महाविहार समितीमध्ये त्यांचा सहभाग असावा. बर्मी सदस्य उ टोक क्यि यांनी एक बिल मांडून भारत, श्रीलंका आणि बर्मा येथील बौद्धांना या समितीत स्थान असावे असे सुचविले. महंताने या सर्वाला नकार दर्शविला व महाबोधी महाविहाराचा ताबा देण्यास नकार दिला.

अनेक दशकांची धावपळ, वार्धक्य, खालावलेली तब्येत आणि महाबोधी महाविहार प्रकरणी निघत नसलेला तोडगा यामुळे अनागरिक धम्मपाल खचले होते. त्यांन

िहाराचे आराखडे तयार केले व पगान या ठिकाणी महाबोधिची प्रतिकृती तयार केली.

इ.स. १४५२ मध्ये तिबेट मध्ये महाविहाराच्या आकाराचे स्तूप बनविण्यात आले व त्यात लामांच्या अस्थी ठेवण्यात आल्या.

इ.स. १४७२ मध्ये पेगू चा राजा धम्मचेतियाने कारागीर पाठवून महाबोधिच्या संपूर्ण रचनेचा आराखडा तयार केला व अतिशय सुंदर आणि भव्य असे महाविहार (स्थानिक भाषेत शेवगुगयी) बांधले.

इ.स. १४४८ मध्ये थायलंडचे राजे तिलोकराजा याने महाबोधी महाविहाराच्या धर्तीवर महाबोधरामा, वाट-जेट-यॉट नावाचे महाविहार बांधले. त्यांनी खास श्रीलंके वरून बोधीवृक्षाच्या झाडाचे रोपटे आणून बांधलेल्या महाविहाराच्या बाजूला लावले. एवढेच नव्हे तर बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण परिसराची (भ. बुद्धांचे सात महत्त्वाच्या ठिकाणांसहित) मूळ आकाराची प्रतिकृती बनवली. पुढे १६व्या ते १८व्या शतकाच्या दरम्यान चियांग राई या भागात महाबोधी महाविहाराच्या आकाराचे विहार बनविण्यात आले.

१६व्या शतकात नेपाळ वरून एका उपासकाने बुद्धगयेला येऊन महाबोधी महाविहाराचा नकाशा बनविला आणि नेपाळ मधील पाटण येथे महाविहार साकार केले. १९३४ च्या भूकंपामध्ये ते उध्वस्त झाल्यानंतर तेथे पुन्हा ते उभारण्यात आले.

१७४८ मध्ये चीन मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराच्या आकाराचा विहार – उ ता झू पेकिंग शहराच्या लगत बनविण्यात आला.

या दरम्यान बदलेल्या परिस्थिती मुळे, बुद्धगयेकडे परदेशी भिक्खू आणि उपासकांचा ओघ कमी झाला. महाबोधी विहार (संघाराम) तर ओस पडले होते व महाबोधी महाविहारात अगदीच थोडे भिक्खू शिल्लक राहिले. कालांतराने तेही निघून गेले.

१७व्या शतकाच्या पूर्वार्धात शैव पंथाचा गोसावी घमंड गिरी हा बुद्धगया येथे येऊन राहिला. हळू हळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला. स्वतःला महंत म्हणून घेणाऱ्या या घमंड गिरीने महाबोधी महाविहाराच्या जवळ व महाबोधी संघरामाच्या परिसरात आपला आश्रम स्थापन केला. महाबोधी महाविहारातील काही बुद्धमूर्ती त्याने आणून आपल्या आश्रमात ठेवल्या आणि देव-देवतांच्या मूर्ती म्हणून पूजा अर्चना सुरु केली.

महाबोधी महाविहाराच्या परिसरातील मूर्तींची दैवतीकरणाला सुरुवात झाली!!!

भाग ६

संघर्षाला सुरुवात…

महंत आता खूप ताकतवर आणि श्रीमंत होऊ लागला होता. महाबोधी महाविहार हे स्वतःच्या मालकीचे आहे अशा थाटात वागू लागला. देखभाल विना महाबोधी महाविहाराची रया जाऊ लागली. महाविहारातील अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमेचे पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला लागले. १७९० मध्ये अनेक ब्रिटिश चित्रकार, प्रवासी, सर्व्हे करणारे, आर्किटेक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ बुद्धगयेला भेटी देऊ लागले. यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार विलियम आणि थॉमस डॅनियल हे होते ज्यांनी महाबोधी महाविहाराचे त्यावेळेसची चित्रे काढून ठेवली आहेत.

१८११ मध्ये ब्रिटिश सरकारने फ्रान्सिस बुकानान यांना बिहार प्रांत आणि बुद्धगयेच्या सर्व्हे साठी बोलावले. फ्रान्सिस साहेबांनी त्यावेळेसच्या बुद्धगयेचे तपशीलवार वर्णन केले मात्र हुयान त्सांग ने इ.स.६३२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे नव्हते. महाबोधी महाविहारातील सोने, चांदी, हिरे, सुंदर कोरीव मूर्ती व वेलबुट्टी, आतील कोरीव लाकूडकाम यापैकी काहीही दिसले नाही. बुकानान यांना महाविहाराचे कोसळले मजले, महंताने व इतर लोकांनी अनेक स्तूपांना खोदून त्यांच्या विटांनी आश्रम आणि घरे बांधल्याचे दिसले. महंताने महाविहाराच्या भोवतालचे कोरीव स्तंभ काढून शेजारीच पांचपांडव नावाचे मंदिर बांधले होते. वज्रासनाशेजारी ठेवलेला दगड ज्यावर बुद्धांचे पदचिन्ह साकारले होते, तो दगड महंतांच्या मंदिरात विष्णुपद म्हणून ठेवल्याचे दिसले.

१८४७ मध्ये कॅप्टन मारखम किटो यांनी सर्वात पहिल्यांदा येथे उत्खनन केले. सम्राट अशोकाने बसवलेल्या काही कुम्पणपट्टी व अनेक शिल्प सापडले. त्यातील अनेक भारतातील विविध संग्रहालयात पाठवून देण्यात आले.

१८६१ मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या सूचनेनुसार मेजर मीड यांनी उत्खनन केले. मुख्य महाविहारात संपूर्ण डबर साचले होते व पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचले होते.

१८७६ साली सर रिचर्ड टेम्पेल यांनी अनेक बुद्धमूर्ती बुद्धगयेच्या परिसरात विखुरलेल्या दिसल्या. १८८६ मध्ये सर एडविन अर्नोल्ड (द लाईट ऑफ एशिया चे लेखक) यांना बुद्धगयेची स्थिती पाहून धक्काच बसला आणि श्रीलंकेत गेल्यानंतर त्यांनी तेथील बौद्धांना हे महाविहार पुनश्य नूतनीकरण करावे असे सुचविले.

१८९१ मध्ये श्रीलंकेतील एक तरुण बौद्ध नागरिक धम्मपाल व त्याचा मित्र, जपानी बौद्ध भिक्खू कोझेन गुणरत्न हे गया वरून बुद्धगयेला येत असताना त्यांना वाटेत अनेक तोडलेल्या बुद्ध प्रतिमा दिसल्या. बुद्धगयेतील स्थिती तर आणखीन दयनीय झाली होती. धम्मपालांना महाबोधी महाविहारच्या अनेक कोरीव प्रतिमा या गावातील भिंतींवर अथवा विहिरीवर प्लास्टर केलेल्या दिसल्या. काही बुद्धमूर्ती विहिरीतील पाणी काढण्यासाठीच्या दोरीला वजन म्हणून वापर

र शैव महंताच्या मालमत्तेवर इतर कोणाचाच कोणताही अधिकार नसेल. किती अजब कायदा बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचा!!!

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २६ प्रमाणे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदाय अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक किंवा धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थानांची स्थापना करून, त्या स्वखर्चाने चालविण्याचा; धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा; जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा; आणि कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

बोधगया मंदिर कायदा १९४९, भारतीय राज्यघटनेच्या तत्वांवर आधारित आहे का? भारतातील इतर मंदिरांचा कायदा काय सांगतो?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!