देशमुख्यपान

भारतीय सुरक्षा दलाने दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा केला खात्मा.

भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) काश्मीर पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार ही कारवाई शेवटच्या टप्प्यात असून चकमक सुरू असलेल्या संपूर्ण भागाची तपासणी करण्यात आली आहे.

काश्मीर विभागीय पोलिसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कुलगाम पोलिसांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही कारवाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. या संपूर्ण भागात शोधमोहीम राबवण्यात आली आहे.”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!