क्रिकेटभारतमहाराष्ट्रमुख्यपान
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची ऑस्ट्रेलियासोबत लढत.

काल कोलकाता इथं झालेल्या दुसऱ्या उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत प्रवेश केला. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अहमदाबाद इथं होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आठव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या षटकात २१२ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघानं हे आव्हान ४८व्या षटकात पूर्ण केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत