मुख्य पान

तीन दिवसात फटाक्यांचा १४ टन कचरा कल्याण-डोंबिवलीत जमा

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, अनेक पर्यावरणप्रेमी संस्था, नागरिक यांनी दिवाळीच्या सणाच्या काळात प्रदूषण करणारे फटाके फोडू नका. फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करूनही कल्याण, डोंबिवली शहरातील नागरिकांनी मागील तीन दिवसाच्या दिवाळी सणाच्या काळात वेळेचे कोणतेही बंधन न पाळता नागरिकांनी फटाके फोडले. अशा फटाक्यांचा रस्त्यांवर, सोसायट्यांच्या परिसरात पडलेला १६ टन कचरा पालिकेच्या घनकचरा विभागाने जमा केला आहे.

फटाके फोडून झालेला कागदी आठ टन कचरा, फटाक्यांंवरील प्लास्टिक वेष्टना सहा टन कचरा पालिकेच्या सफाई कामगारांनी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांच्या विविध भागातून जमा केला आहे. कल्याण डोंबिवली शहरांमध्ये शहर स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. कचरा मुक्त शहरे करण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. दिवाळीच्या सणाच्या काळात रस्त्यांवर अधिक प्रमाणात फटाक्यांचा कचरा पडण्याची शक्यता गृहीत धरून दैनंदिन सफाई बरोबर फटाक्यांमुळे पडणारा कचरा उचलण्याची विशेष नियोजन घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी निश्चित केले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!