पाच दिवसानंतरही बदलापुरातील पाणी पुरवठा विस्कळीतच.

गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीज पुरवठा, केंद्रातील दुरुस्ती करून हा पुरवठा शनिवारी सुरळीत होण्याची आशा होती. मात्र सोमवार उजाडला तरी अद्याप शहरतील पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून ऐन दिवाळीत उद्भवलेल्या या समस्येमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. ऐन सुट्ट्यांमध्ये नागरिकांना टँकर मिळवण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागते आहे.गुरूवारी सायंकाळी बदलापूर, अंबरनाथसह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसात बदलापूर शहरातील उल्हास नदीवरील बॅरेज येथील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक बाबींमुळे शुक्रवारी पाणी पुरवठा ठप्प होता. शुक्रवारी रात्री हा पुरवठा काही अंशी सुरू झाला होता. मात्र विजेचा पुरवठा आणि इतर कारणांमुळे त्यात अडचणी येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारीही अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत