मुख्य पान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श झालेल्या भूमीला ८६ वर्षे पूर्ण

मसूर, ता. कराड येथे ६ नोव्हेंबर १९३७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महारपरिषदेचे सातवे अधिवेशन झाले होते. त्याचा ८६ वा वर्धापनदिन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीने झाला.यावेळी तानाजी बनसोडे यांनी वंदना घेऊन सदर दिवसाचे महत्व सांगितले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या स्मरर्णाथ भव्य वास्तू निर्माण करावी व त्याचा वारसा जतन करावा. त्याचे नवीन पिडीला माहिती होणे करिता चित्रफीत, माहिती पटची माहिती सदर वास्तूत दाखविणेत यावे.आपले मसूर गावाचे भाग्य आहे की ज्या भूमीत डॉ. बाबासाहेब आपल्या गावात दोन वेळा येऊन गेलेत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि क्रांतीभूमी आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई (आठवले गट) जिल्हा सचिव शंकरराव लोकरे होते. सुत्रसंचालन तानाजीराव बनसोडेयांनी केले.यावेळी उत्तमराव कांबळे,साहेबरावलोखंडे, प्रकाशवाघमारे, सुधाकर शिलवंत, गोपीनाथ कांबळे, संतोष कांबळे, शंकरराव उमापे, आदी मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्यकर्तृत्वाबद्दल माहितीविशद केली.संयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटवकराड तालुका भारतीय बौध्द महासभा यांनी केले. याप्रसंगी संतोष किरत, सुदाम ढापरे, दिलीपराव भंडारे, अशोकभाऊ सोनवणे, आबासाहेब व्यवहारे, सिध्दार्थ किर्तीकर, महेंद्र वाघमारे, विनोदमोरे, सुधाकर सरवदे, सिध्दार्थ कारणे, दादा भंडारे, विश्वनाथ लोकरे, प्रविण लोकरे, लक्ष्मी धावारे, राजाबाई रोकडे, अरूणा क्षिरसागर, विमल चव्हाण, सुरेखा कारणे, वंदना कारणे, संगीता लोकरे, रेखा लोकरे व सर्व कराड तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!