महाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथील लाभार्थाना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ द्या

दलित जनतेचे १६ नोहेंबर पासुन नगर परिषदे समोर अमरण उपोषण

नळदुर्ग शहरात गोर गरीब जनता शासकीय जागेवरती अतिक्रमण करून गेले ७० ते ८० वर्षाच्या अगोदर पासून कोणी पत्र्याचे शेड तर कोणी कच्च्या दगड मातीचे बांधकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत अशा गरीब जनतेला कुटुंबाला महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजनेचे लाभ मिळावा म्हणून शासन सर्वोतपरी प्रयत्न करित आहे .
परंतू नळदुर्ग शहरात रमाई आवास घरकुल योजनेचे चक्क तिन तेरा नव आठरा अवस्थेत दिसून येत आसल्याने नागरीकात व लाभर्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे .
प्रत्येक कुटुंबाला त्यांचे हक्काचे व पक्के घर मिळावे म्हणून केंद्र शासन महाराष्ट्र शासनाने खुप चांगली योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळायला पाहिजे .
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज संपूर्ण देशभरात रमाई आवास घरकुल योजनेचे कामे चालु आहेत . गेली २०१० ते २०११ पासुन जे नागरीक शासकीय जागेवरती अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत आशा लाभार्थी कुटुंबाना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी खुप प्रयत्न केले तरीही कोणताही अधिकारी किंवा राजकीय पुढा ऱ्यानी केले नाही ही राहाती जागा नियमाकुल करावी आणी त्या ठिकाणी वरिल योजनेचा लाभ मिळवून द्यावा ही प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहोत नळदुर्ग शहरांमध्ये अनेक वर्षापासून रमाई घरकुल आवास योजना राबवण्यासाठी नगर परिषद असमर्थ ठरले आहे अनेक वेळा पाठपुरावा ही केला तरीही प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल या दलित जनतेनी घेतलेली नाही .
रमाई आवास घरकुल योजनेचे लाखो रुपये नगर परिषदेच्या पेटीत मात्र धुळखात पडून आहेत ज्यांच्या कडे ८ अ चा दाखला आहे आशा लाभार्थाना या योजनेचा लाभ मिळणार परंतू रमाई विभागातील कर्मचाऱ्यांनी मात्र लाभार्थाना वेगळे कारणे सांगुन नागरीकांची दिशा भुल केली आशा कर्मचार्‍याना एकतर निलंबित करा नाहीतर टेबल बदली करा आज तागायत शासन दरबारी कुठल्याही प्रकारचे नोंद नगरपालिका घेत नाही अनेक वेळा उपोषणे आंदोलने मोर्चे झाले तरी ही दलित जनतेचा वाली कोणी ठरला नाही यांच्या निषेधार्थ दिनांक 16 नोव्हेंबर २०२३ पासून बुद्धनगर भीमनगर डॉ आंबेडकर नगर इंदिरानगर दुर्गानगर वसंतनगर साठेनगर आदी भागातील गोरगरीब जनता नळदुर्ग नगर परिषदेच्या समोर आपल्या हक्कांच्या मागणीसाठी बेमुदत अमरण उपोषण करणार आहे आशा प्रकारचे निवेदन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा अतुल कुलकर्णी तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना दिले आहे . .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!