२६ नोव्हेंबर ‘भारतीय संविधान गौरव दिनी’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे युद्धपातळीवर वितरण करा ! आरपीआय (आरके) पक्षाचा शासनाला इशारा

मुंबई: २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान गौरव दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे वितरण करा अशी मागणी आरपीआय (आरके) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाराम खरात व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव साबळे यांनी केली असून, याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून शासनाला इशारा दिला आहे की, जर गेल्या २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सदर पुरस्काराचे वितरण नाही केले तर पक्षाच्यावतीने लोकशाही मागनि बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल. सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्काराविषयी शासनाची उदासिनता व दुजाभाव का? आता पुरस्कार वितरणाचा मुहूर्तं कधी काढणार? पुरस्काराविषयी शासनाने हेळसांड करत आहे का? इत्यादी प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुरस्कार वेळेवर वितरण न होण्यामागे मानसिकतेचा अभाव असून पुरस्कारांची अवहेलना होत असल्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाजातील उल्लेखनिय समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती व नोंदणीकृत संस्थांना दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेबगायकवाड पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रविदास पुरस्कार या महापुरुषांच्या नावाने सदर पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मात्र कोरोना महामारीमुळे सन २०१९-२०२० व २०२० २०२१ या दोन वर्षात पुरस्कार दिले गेले नाहीत. महाविकासआघाडी सरकारने २०२२ मध्ये मदर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुन्हा नव्याने पुरस्काराची वृत्तपत्रात जाहीरात देऊन व्यक्ती व संस्थांचे प्रस्ताव मागीतले होते. सदर सामाजिक न्याय खात्याने आलेल्या प्रस्तावाची छाननी करून महाविकास आघाडीतील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी सदर पुरस्कार वितरणासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी दि. २६ जून २०२२ ही तारीख निश्चित केली होती, ठिकाणही ठरले होते. परंतु अकस्मात राजकीय पेच निर्माण झाल्यामुळे सदर पुरस्कार वितरणाचा सोहळा होऊ शकला नाही. मात्र तद्नंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार, बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार क्रीडा खात्याचा शिवछत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार, कलावंतांसाठी सांस्कृतिक खात्याचे अनेक पुरस्काराचा प्रकारचा गवगवा न करता ते का वितरीत केले गेले. करण्याचे शासनाने आवाहन केले होते.
अर्ज करून आज तीन महिने लोटले तरी पुरस्कारांचा मुहूर्त उरत नाही. सदर पुरस्काराविषयी शासन भालकल करीत असल्याने शासनाची पुरस्कार वितरणाची मानसिकता नसल्याची चर्चा कार्यकत्यांत सुरू असून कवी, लेखक, शाहीरी भलाकार, साहित्यिक यांचा हिरमोड झाला असून येत्या भारतीय संविधान गौरव दिनी दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सदर रखडलेल्या पुरस्कारांचे युद्धपातळीवर वितरण करावे. अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण सह आयुक्त कार्यालयासमोर आरपीआय (आरके) पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन लोकशाही मार्गाने केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष राजाराम खरात व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी नमुद केले आहे. मात्र महापुरुषांच्या नावे गेली सन २०१९ २०२३ पर्यंत ४ वर्षे रखडलेल्या पुरस्काराविषयी शासनाला अद्याप कोणताही मुहूर्त मिळू नये? बाब अतिशय खेदजनक आहे हा सरळ सरळ महापुरुषांबाबत दुजाभाव शासन करित असल्याची भावना आंबेडकरी कार्यकर्त्यांची झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत