
काल (शुक्रवारी) नेपाळमध्ये ६.४ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. रात्री 70 जणांनी आपले प्राण गमावले होते. आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान एका महिन्याच्या आत झालेला हा तिसरा भूकंप आहे, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. नेपाळमधील मध्यवर्ती पट्टा “सक्रियपणे ऊर्जा सोडणारे क्षेत्र” म्हणून ओळखले जात असल्याने लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा भूकंपशास्त्रज्ञाने दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत