देशमुख्यपान

अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची  चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या नवी दिल्ली इथं कला प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.वन दलातल्या वनरक्षकांचे हक्क आणि समाजातला त्यांचा सन्मान यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही याची काळजी घेणं, तसंच स्वदेशी ज्ञानाचं  जतन,संवर्धन आणि वापर करण्याची गरज असल्याचही त्यांनी सांगितलं.जगातल्या एकूण वाघापैकी 70 टक्के वाघ भारतात आढळत असून, या यशात व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यानांच्या आसपास राहणाऱ्या समुदायांचही महत्त्वाचं  योगदान आहे, असं त्या म्हणाल्या 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!