भगवान बुद्धांची विचारधारा….

प्रवचनातील प्रश्न व उत्तरे.
प्रश्न: आपण कृपया हे स्पष्ट करा की, इतरांचे दुःख करणे म्हणजे च नेमके काय करणे?
उत्तर: आपण केवळ तात्पुरत्या उपाय याबद्दल बोलत नाही. एखाद्याची भूक तहान भागवणे, औषध पुरवणे हे सगळे तर आपण करायलाच हवे पण हे सर्व वरवरचे उपाय झाले. कोणाच्या देण्यामुळे जगात आत्तापर्यंत कोणाच्याही गरजा पूर्ण होऊ शकल्या नाही त. उलट दुःख आणि वेदनांचे ते एक कारण आहे. कमतरता कशाची असेल, तर ती परिपूर्ण आनंदाची आहे. म्हणूनच आपण अशा जीवनमात्रामध्ये परिपूर्ण आणि चिरंतन आनंदाची प्राप्ती ज्यामुळे होऊ शकेल अशा करुणे ची रुजवत करतो. जे धम्माचे अनुयायी आहेत, बोधिसत्व आहेत योगीजन आहेत उपासक आहेत त्या सर्वांचे एकमेव उद्दिष्टे हेच आहे. अनेक स्वरूपाची तात्पुरती मदत ते इतरांना करतातच, पण त्यांना चिरंतन आनंद प्राप्त व्हावा हेच त्याचे प्रमुख लक्ष असते. हेच बोधिसत्व योगीजन अनुयायी आणि उपासक यांचे हे प्रमुख कार्य असते.
प्रश्न: धम्म हा पूर्वजन्म आणि पुनर्व जन्माची सत्यता मानतो. मग आपण जो अ शाश्वत वादाचा पुरस्कार केला आहे त्याच्याशी याची संगती कशी काय लागते?
उत्तर: ज्या गोष्टी शाश्वत नसतात, त्या सतत बदलत असतात. अशुद्धता ही अशाश्वत असते म्हणून शुद्धतेची शक्यता निर्माण होते. अशुद्धता शुद्धतेत आणि अपूर्णता संपूर्णतेत परावर्तित होते. बदल हा केवळ स्वरूप पालटण्याचे एक निमित्त बनत असतो. आपल्या जीवनाला योग्य दिशेकडे वळवले तर आपण आपल्या आयुष्यात निर्माण होणारे नकारात्मक आकृतीबंध नष्ट करू शकतो. जर गोष्टीचे किंवा पदार्थाचे स्वरूप हे अपरिवर्तनीय असते तर त्यातून अधिक चांगल्या गोष्टी किंवा शाश्वत स्वरूपाची उत्पत्ती शक्य नव्हते.
कर्म आणि पुनर्वजन्म याबाबत बोलावयाचे झाल्यास, अशाश्वत याचा अर्थ आपल्या जीवन सरितेवर आपला संपूर्ण ताबा असणे, जे एका पवित्र नदीप्रमाणे आहे. जी कुठेही त्याच स्वरूपात नसते. प्रत्येक क्षणी तिचे पाणी बदलत राहते, स्वरूप ही बदलते. आपण जर हार फुले यांचे निर्मल्य तिच्यात टाकून तिला प्रदूषित करीत असू तर तिचे स्वरूप गालिछच होणार की नाही? त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवन सरितेला वाईट विचार, वाईट कर्मे भ्रम आदींनी प्रदूषित होऊ दिले तर आपली उत्क्रांती नकारात्मक होऊ लागेल आणि आपण खालच्या दर्जाच्या योनी जन्म घेऊ!
याउलट, जर आपली जीवन सरिता आपण कौशल्याने नियंत्रित केली तर आपली उत्क्रांती उद्धर्व दिशेने होऊ लागते. आपण उच्च योनीत जन्म घेतो आणि होऊन आपणास बुद्धत्वाची प्राप्ती देखील होऊ शकते. आपल्या आयुष्यात येत जात असलेले अपूर्णतेचे अनुभव येत- जात राहतील. जे अपूर्ण, अशुद्ध आहे त्या बाबतीतच परिपूर्णतेची, शुद्धतेची शक्यता असल्याने आपले जीवनही उत्क्रांत होऊन पूर्णत्व प्राप्त करेल आणि जेव्हा हे घडेल तेव्हाच मनुष्य जन्माचे सार्थक होईल.
भगवान बुद्धांची विचारधारा
प्रसारित :- सुरेश भवर नाशिक
नमो बुध्दाय जय भीम, सुप्रभात????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत