फाल्गुण पौर्णिमा; पुत्र राहुल ची धम्मदीक्षा.

पुत्र राहुलची धम्मदिक्षा :
भगवान बुध्दांनी ज्ञान प्राप्तिनंतर कपीलवस्तु येथे आल्यानंतर राजपरीवारातील त्यांचे आप्तस्वकीय सर्वजण त्याला भेटले. परंतु पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल मात्र तेथे भेटण्यासआले नाही. म्हणून तथागत सोबत सिरीपुत्र आणि मौद्गल्ल्यायन यांना घेवून यशोधरेला भेटावयास गेले तेव्हा पतीप्रमाणे ती सुध्दा प्रव्रज्ज्या धारक जीवन जगत होती आणि अशा अवस्थेत ती सासु सासरे यांची सेवा करीत होती. पुत्र यांचे संगोपन करणे ही सुध्दा जबाबदारी पार पाडत होती. तेव्हा तथागताने तिच्या या महान त्यागाचे कौतुक केले व
“तु सत्य पुण्यवान श्रेष्ठ आचार विचाराची अनुपम नारी आहेस. “असे उद्गार काढले. एवढे बोलुन ते बाहेर आले आणि आपल्या भिक्खु संघासह भोजन ग्रहण केले.
यशोधराने केवळ सात वर्षाच्या राहुल बालकाला लांबुनच भगवान बुद्धाकडे अंगुलीनिर्देश करून हे तुझे पिता आहेत असे सांगीतले. भगवान बुद्ध भोजनानंतर राहुलला आशीर्वाद देऊन भिक्खुसंघासह राजवाड्या -बाहेर जेंव्हा जाण्यास निघाले तेंव्हा राहुलही त्यांच्या मागेमागे जाऊ लागला.
तेंव्हा तथागत बुध्दांनी सिरीपुत्ताकडे पाहुन म्हटले, “माझा पुत्र मला ऊत्तराधीकार मागत आहे, “बाळा, धनसंपती रूपात माझ्याकडे देण्यास कांही नाही ” सदाचारी जिवन हेच माझे धन आहे. तु भिक्खुसंघात प्रवेश करून धम्म नियमाचे पालन करणार असलास तर सर्वश्रेष्ठ असे विपुल धन आहे. ” राहुलनेही होकारार्थी उत्तर दिले. मुंडन करून भगवी वस्त्रे चीवर परीधान करून धम्म सेनापती सारीपुत्त्ताकडुन त्याला धम्म दिक्षा दिली व श्रमण म्हणून संघात सामील केले तो दिवस फाल्गुण पौर्णिमा इ.स.पू..527 होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत