मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

बीड जिल्ह्यात दोन नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद

मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये. सोमवारपासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. रोडवर टायर पेटवून आंदोलक रस्ते अडवत आहेत. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर परिस्थिती आणखी चिघळू, नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळीच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, त्यामुळं आदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जालना जिल्ह्यातही दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून जिल्हाधिकाऱ्यांना काही अनुचित घटनांची माहिती मिळाल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळं परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!