महाराष्ट्रमुख्यपान

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी संपूर्ण गोव्यात बी एस आय मिशन प्रमाणे कामाला लागावे -एस के भंडारे

उमेश सुरवसे
धाराशिव दि.१(प्रतिनिधी)-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने अशोक विजया दशमी दिनी दि 14 आॅक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले असून ती धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ,धर्मांतर विरोधी कायदे केले/करण्यात येत आहेत ते संविधानाने दिलेले मूलभूत अधिकाराच्या कलम 25 च्या विरोधात आहेत . संविधानाने दिलेले अधिकार,सोयी सुविधांमुळे आपण प्रगती केली त्यामुळे संविधान धर्माच्या आधारावर करण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे समाजात असहिष्णुते चे वातावरण झाले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी गोव्यातील सर्व समविचारी संघटनांना बरोबर घेऊन बी एस आय चे मिशन प्रमाणे कामाला लागावे असे प्रतिपादन एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष /स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल ) यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या गोवा राज्य शाखेचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर ,सदस्यता अभियान व राज्य कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम गोव्यातील आझाद भवन , पर्वरी ,पणजी येथे संपन्न झाला त्यामध्ये केले.एस के भंडारे यांनी प्रबोधनाची आचार संहिता व कार्य व हिशोबाची पारदर्शकता याविषयावर मार्गदर्शन केले.
राजेश पवार (राष्ट्रीय सचिव ) यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मिशन या विषयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी आठ गोल्डन मार्ग सांगितले त्यात प्रामुख्याने चलो बुद्ध की ओर अंतर्गत बहुजन संघटना ,समाज यांच्यात समन्वय साधून जातीअंताच्यासाठी काम करावे लागेल असे सांगितले
यावेळी चर्चेअंती सर्वसंमतीने गोवा गोवा राज्याची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे.अध्यक्ष- एस के जाधव,सरचिटणीस – निखिल एस प्राजक्ते, कोषाध्यक्ष- राजू कृष्णा जाधव,उपाध्यक्ष (संस्कार विभाग)- प्रसाद के दुधवडे, उपाध्यक्ष (महिला विभाग) -छाया मनोहर कोरगावकर,उपाध्यक्ष ( प्रचार पर्यटन विभाग)- मीरा कांबळे,
(उपाध्यक्ष संरक्षण विभाग)- किशोर के जाधव,
सचिव ( संस्कार विभाग)- सुरेश वामन जाधव,
सचिव (महिला विभाग) -प्रमिला निखिल प्राजकते,
सचिव (महिला विभाग) -भाग्यश्री जितेंद्र कांबळे,
सचिव (संरक्षण -समता सैनिक दल विभाग )- मधुमाला सिद्धार्थ कांबळे,संघटक -शिवाजी अर्जुन सोनवणे,प्रकाश के जाधव,सोनिया राजू जाधव, रवी एस दड्डी.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के जाधव होते व सूत्रसंचालन राजू जाधव यांनी केले, या कार्यक्रमासाठी गोव्यातील मडगाव,पणजी ,वास्को इत्यादी विभागातून कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!