३१ऑक्टोंबर.. दिनविशेष.

“गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल.”–डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
जनता साप्ताहिक.. ३१ऑक्टोंबर१९३०.
•डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी..”जनता” पाक्षिक वृत्तपत्राचा प्रथम अंक २४ नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित केला..संपादक श्री. देवराव विष्णू नाईक होते..
•३१ऑक्टोबर १९३०रोजी.. जनता पाक्षिकाचे साप्ताहिक झाले.
•या वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून बाबासाहेबांनी…
“‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करुन उठेल” हे वाक्य दिले होते.
त्यांनी जनतेत सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून लिहून पाठविलेली पत्रे प्रकाशित केलीत .
•१९५५ पर्यंत जनता सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कधी त्यात अनियमितपणा निर्माण झाली पण तरी ते खूप दिवस टिकले. ०४ फेब्रुवारी १९५६ रोजी जनताचे नामकरण “प्रबुद्ध भारत” असे करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत