
(तर खालील वेगवेगळ्या कारणांपैकी आरक्षण हे एक प्रगतीचे साधन आहे.)
१) विज्ञानवादी दृष्टिकोन स्विकारला
बौद्ध समाजाने अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती, वाईट परंपरा, भाकडकथा, पुराणकथा, देवदेव, देव्या, अंगात येणे, सगळे सोडून दिले.
त्या ऐवजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला, बौद्ध लोक पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारत नाहीत. म्हणून त्यांची प्रगती होत आहे.
२) बौध्दानी ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांना जाहीररित्या नाकारले.
मनुस्मृति, वेद, रामायण, महाभारत, ब्राह्मण्य, स्मृती, पुराणे, गीता या सर्व धर्मग्रंथांची चिकित्सा करून बौद्धांनी हे धर्मग्रंथ बाजूला केले. म्हणून बौद्धांची प्रगती होत आहे.
३) कोणतेही धार्मिक विधी /कर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेत नाही.
२२ प्रतिज्ञा पैकी ही फार महत्त्वाची प्रतिज्ञा होती, _ब्राह्मणांचा हस्तक्षेप १००% बंद करण्याचे महान कार्य बौद्धांनी केले.
ज्या कोण्या जातीला भारतात जर प्रगती करायची असेल तर त्यांनी ब्राह्मणाकडून कोणतीही धार्मिक विधी /कर्म करून घेऊ नये. यामुळे बौद्धांची प्रगती होत आहे.
४) जातीने ठरवून दिलेली कामे बौद्धांनी ( पूर्वाश्रमीचे महार) नाकारली.
आज २०२३ साल सुरु आहे, महार जातीची गाव खेड्यातील पिढीजात कामे उदा.
A) मेलेले जनावरे ओढणे
B) मेलेल्या माणसाचा दुसऱ्या गावात निरोप देणे
C) “भाकर वाढ मायसाहेब”.. म्हणून ‘येसकरी’ करणे
D) दोन शेतकऱ्यांच्या बांधाचे भांडण मिटवणे
E) दोन गावाच्या सरहदीचे भांडणे मिटवणे
F) चांभाराला कातडी विकणे
G) गावाचे रक्षण करणे… इत्यादी कामे महार लोक करत असत… आता महाराष्ट्रात एकही व्यक्ती महार जातीला ठरवून दिलेले कार्य करताना दिसत नाही. म्हणजेच महारांनी १०० % जात नाकारली. त्यामुळे बौद्धांची प्रगती झाली.
५) शिक्षणाचा प्रचंड ध्यास
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते, त्यांनाच आदर्श मानून बौद्धांनी शिक्षण सुरू ठेवले, ते पण उच्च शिक्षण…❗ आज समाजात हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, हजारो वकील, लाखो कर्मचारी, हजारो अधिकारी, लाखो उच्चशिक्षित, लोक आहेत हे सर्व शिक्षणामुळे. शिक्षणाच्या मूळ प्रेरणेमुळे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रॅज्युएट हे बौद्ध समाजातील आहेत. शिक्षणाच्या बाबत बौद्धांची टक्कर ब्राह्मणासोबत सुरू आहे.
६) अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची तयारी
बौद्धावर अन्याय होऊ द्या…, सर्व महाराष्ट्र पेटून उठतो, सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना, नेते, एक होतात. रस्त्यावरचा संघर्ष असो, निदर्शने, मोर्चे, जेल भरो, सत्ताधाऱ्यांशी संघर्ष, मंत्र्याची गाडी अडवणे, कोणत्याच आमदार, खासदार, मंत्र्याला न भिने, जयभीम चा नारा बुलंद करणे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा/फोटो/निळा झेंडा याचा अपमान न सहन करणारा समाज म्हणजे बौद्ध समाज. ‘संघर्ष’ समाजाला प्रगतीपथावर घेऊन जात आहे.
७) ज्ञानाची प्रचंड आवड
सभा, संमेलने, चर्चासत्र, परिसंवाद, भाषणे, याचे आयोजन करणे, नियोजन करणे, पुस्तक वाचणे, यामध्ये बौद्ध समाज सर्वांपेक्षा पुढे आहे. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीला करोडो रुपयांची पुस्तके गाव खेड्यातील बौद्ध व्यक्ती विकत घेऊन जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथावर प्रेम करत असत, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बौद्ध समाजात प्रचंड अशी वाचन संस्कृती रुजली आहे.
पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून प्रगती. महापुरुषांच्या जयंती निमित्त प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे, हे सर्व ज्ञानाची प्रचंड आवड असण्याचे लक्षणे आहेत. ज्याद्वारे बौद्धांची प्रगती होत आहे.
८) अन्याया विरोधात उभा टाकणारा समाज
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगणारा समाज,
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, अशी धारणा असणारा समाज. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, महिला यांच्या समर्थनात उभा टाकणारा समाज, कोणत्याही शोषित वंचित समाजावर जर अन्याय झाला तर बौद्ध समाज त्याचा निषेध करण्यासाठी सर्वात पुढे असतो.
समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या विचारधारेवर चालणारा समाज म्हणजे बौद्ध समाज. परिवर्तनवादी विचारधारेमुळे बौद्ध समाजाची प्रगती होत आहे.
९) हिंदू धर्माचा त्याग
(स्वाभिमान अंगिकारला)
बौद्धांच्या प्रगतीचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी सोडलेला हिंदू धर्म. अन्याय,अत्याचार, असमानता गुलामी, क्रमिक असमानता, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, स्त्री दास्य या सर्वांतून मुक्ती हिंदू धर्म सोडल्यामुळे मिळाली. स्वर्ग, नर्क, देव, चमत्कार, पाखंड, पुनर्जन्म नाकारणारा आणि समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य, प्रज्ञा, शील, करुणा, पंचशील, अष्टांगिक मार्ग, दहा पारमीता,
वैज्ञानिक बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे बौद्धांची प्रगती झालीआहे.
१०) सामाजिक प्रतिनिधित्व तथा आरक्षण
आरक्षणाचे चार प्रकार आहेत, शिक्षणातले आरक्षण, नोकरीतील आरक्षण, पदोन्नती मधील आरक्षण आणि राजकीय आरक्षण.
यामधील राजकीय आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठी असावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. राजकीय आरक्षणामुळे बौद्धांचे नुकसान झालेले आहे. विधानसभा आणि लोकसभेसाठी आरक्षित असणाऱ्या मतदारसंघातून प्रस्थापित पक्षांचे तळवे चाटणारे लोक निवडून जातात. त्यामुळे राजकीय आरक्षणाचा फायदा न होता तोटाच झालेला आहे. शिक्षणातील आरक्षण आणि नोकरी मधील आरक्षण याचा मात्र बौद्धांना प्रचंड फायदा झालेला आहे. प्रगतीचे हे सुद्धा एक कारण आहे.
जय भीम
जय संविधान
आपला
सिद्धार्थ शिनगारे
छत्रपती संभाजीनगर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत