
जसे नेतृत्व तशीच विचार धारा या उक्तीप्रमाणे दिल्ली पासुन गल्ली पर्यंत सत्ताधाऱ्यानी जणू बापाची प्राँपर्टी असल्या गत एका मागुन एक असा खाजगी करणाचा सपाटाच लावला आहे .अनेक सरकारी कंपन्या भांडवलदारांच्या ताटात वाढून त्यांच्याच पोटात जाव्यात याचा “पन” केलेल्या मतलबी राजकीय पक्षांनी आणि पुढाऱ्यांनी इथल्या सामान्य माणसाला फक्त मातीत गाडण्याचेच धोरण निश्चित केले आहे. देशात कमालीची बेरोजगारी वाढत असताना खाजगीकरणाचा सपाटा म्हणजे इथल्या तरूणांना गुलाम करण्याचाच कुटील डाव आहे. ऐवढे करूनही भांडवल शाही ला अभय देणाऱ्या सत्ता पिपासुंचे मन भरले नाही म्हणून आता सरकारी शाळांचे खाजगीकरण नेमकं कशा साठी???हा फक्त एक प्रश्न नाही तर या मागे अनेक दृष्टशक्तीचे हालकट मनसुबे आहेत हे मात्र नक्की आहे. खाजगी शाळा ,त्यांची भरमसाठ फिस.सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असताना आता सरकारने गरीबांच्या हक्काचे शिक्षण सुध्दा विकायला काढले हे कशाचे धोतक आहे. सत्ताधीस माणूस नावाची माणसे इतकी पिपासु असु शकतात हे सामान्य माणसाला अविश्वसणीय आहे.।पण हेच कटुसत्य आहे. कारण 62हजार सरकारी शाळा भांडवल दाराच्या मालकीच्या झाल्यावर गरीबांच्या लेकरांना न्याय मिळणार का? का पुन्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण द्यावे लागले ती वेळ पुन्हा बहुजन समाजातील लेकरांच्या नसीबी आणून सरकार पुन्हा या देशात मनुवाद प्रस्थापित करू इच्छित आहे. कारण भांडवलदारांनी मनमानी केली तर बहुजन समाजातील गरीब लेकरं शाळेतच काय पण त्या आवारात फिरणे सुध्दा मुश्कील होईल. कारण भांडवलदारांचा पोशिंदा सरकारच झाल्यावर कोण काय वाकडे करणार.मग शाळाबाह्य गरीबांची लेकरं शिक्षण गेले म्हणून उच्चवर्णीय भांडवलदारांच्या सेवेला सदैव उपलब्ध होतील. हेच ते षडयंत्र आहे. कारण या देशात जेवढे उद्योगपती भांडवलदार आहेत त्यांचे बरोबरीने या देशातील सत्ता धारी राजकारणी पण भांडवलदार आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.। कारण पक्षीय विचाराने उद्या आमदार झालेला एक लोकप्रतिनिधी. लगेच कोट्यवधी रुपयांची ” माया” जमवून प्रत्येक पंचवार्षिक ला या देशातील भांडवल दाराच्या यादीत भर टाकत आहे हे सरकारने तपासून द्यावे. कारण सरकार जरी आंधळे वागत असले तरी जनता उघडया डोळ्याने पहात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. तरी देखील आरक्षण हक्काचे म्हणून खाणाऱ्यानीं आणि आरक्षण पाहिजे म्हणून मागणाऱ्यानीं सुध्दा सरकारी खाजगी करणाला अगोदर तीव्र विरोध केला पाहिजे . कारण आपण परकीय गुलामगिरीतुन मुक्त झालो हे खरं आहे. पण भविष्यात येणारी स्वकीय भांडवलशाही आपल्याला खूप वेदना देईल हे कटुसत्य आहे. म्हणून आता लोकशाहीचा लढा आता निर्णयात्मक वळणावर येऊन ठेपला आहे. आपल्या हक्काच्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद टिकवण्यासाठी आणि संविधानाने दिलेले नैसर्गिक स्वतंत्राचे रक्षण करण्यासाठी सामान्य माणसाला आता खाजगीकरणाचा विरोध करायला हवा .नाही तर येणारी पिढी आपल्याला भांडवलशाही चे हस्तक म्हणून सत्ताधारी राजकीय पुढाऱ्या सोबत आपल्या ही तोंडावर थुंकल्याचे दूरभाग्य आपल्या पदरात पाडून घेण्याचे पाप करू नये..कारण खाजगीकरणातील गुलामाच्या फौज मध्ये पहिल्या रांगेत उभा असलेला एक जण आपल्याच कुटुंबातील सदस्य असेल .आणि हे पाप करणारे सुध्दा आपलेच सत्ता पिपासु असतील हे लक्षात द्यावे लागेल.।।
संतोष कांबळे..।
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत