
लोकशाहीत विकासाची धोरणे राबवण्याचा हेतूने आपण पार्लमेंट व असेम्ब्ली बनवतो.तेथे बुद्धिमान, ज्ञानी, नितीमान,अभ्यासू, कार्यक्षम माणसे सदस्य पाठवली पाहिजे.या लोकांनी लोकहिताची,देशहिताची भुमिका मांडली पाहिजे.ती भुमिका सर्वमान्य झाली तर तिला कायद्याचे किंवा आदेशाचे रूप देऊन अमलात आणले पाहिजे.अमलात आणणारी शासन व प्रशासन यंत्रणा असते. समान मताची,समान भुमिका असलेली माणसे एक संघटना बनवतात.त्याला पंजीकृत स्वरूप दिले तर राजकीय पक्ष बनतो.भुमिका समान असणे, चांगले लक्षण तर आहे .पण अयोग्य धोरण, अपात्र माणसे, लायक नसलेली माणसे जबरदस्तीने लादणे मात्र वाईट लक्षण आहे.घातक आहे. मी जळगाव जिल्ह्यातील माणूस.माझ्या जिल्ह्यातील माझ्या डोळ्यासमोर अकार्यक्षम माणसे ,वरील पांच गुण नसलेली माणसे भाजप ने खासदार निवडून आणली.त्यात पक्षाने चुकीचे उमेदवार तर दिलेच पण आम्ही मतदारांनी सुद्धा ती माणसे लायक नसतांना त्यांना मत दिले.दोन कारणे जाणवतात.एक तर आम्ही काही मतदारांनी दिल्लीच्या नेत्याकडे पाहून मतदान केले.दुसरे कारण काही मते विकत दिली.येथेच आम्ही आमचे आणि लोकशाहीचे नुकसान केले.विकासाला मुकलो. जळगाव लोकसभा मतदारसंघात ए टी पाटील आणि रावेर मधून रक्षा खडसे यांना कोणतेही राजकीय ज्ञान नसतांना, कोणतीही राजकीय भुमिका नसतांना फक्त भाजप आणि पैसा याकडे पाहून मतदान केले.हिच मोठी चूक केली.ए टी पाटील हे दोन वेळा खासदार निवडून दिले.ए टी पाटील हे खासदार निवडून येण्याआधी ही राजकीय व्यक्ती नव्हते.खासदार असतांनाही कोणतेही राजकीय काम केले नाही.खासदारकी संपल्यानंतर ही काहीही राजकीय काम केले नाही.कोणतीही राजकीय भुमिका घेतली नाही.ना लोकसभेत ,ना लोकसभा मतदारसंघात.तर अशा माणसाला खासदार म्हणून उभे करणे ही पक्षाची मनमानी होती.आणि आम्ही मतदारांनी निवडून देणे हा आमचा मुर्खपणा होता.त्याचा परिणाम, आमचे दहा वर्षे लोकसभेतील वाया गेले.लोकसभेतील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो,तसाच मतदारसंघातील एक एक दिवस प्रगतीचा असतो.तो आम्ही तब्बल दहा वर्षे वाया घालवला.केवळ पक्षाची मनमानी आणि मतदारांचा मुर्खपणा. असाच मुर्खपणा रावेर मतदारसंघातील मतदारांनी दोन वेळा केला.आपल्या पार्लमेंटरी लाईफ चे दहा वर्षे वाया घालवले.यात भाजप ला दोन जी हुजूर सदस्य मिळाले.त्यांना फायदा झाला.पण ज्यांचेसाठी खासदार निवडून देण्याची तरतूद संविधानात केली आहे,ती फजित पावली.म्हणजे आम्ही मतदार पार्लमेंटरी संधीचा लाभ घेऊ शकलो नाही .कारण आम्ही मतदारांना आमदार आणि खासदार या पदाचे महत्त्व कळलेच नाही. असाच गैरप्रकार प्रकार शिवसेनेने विधानसभा उमेदवार देतांना केला.आधिकतम गुंड गुन्हेगार माणसांना उमेदवारी देऊन , छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भावनेला हात घालून मत मागितले.आम्ही मुर्ख मतदारांनी गुंड गुन्हेगार लूटारूंमधे छत्रपती शिवाजी महाराज कसे पाहिले,हेच कळत नाही.परिणाम काय?या गुंड गुन्हेगारांनी आमदार निवडून, मंत्री बनून जनतेची लुट केली. जास्त लुटीची संधी मिळाली तेंव्हा
पक्षनेत्याशी गद्दारी केली.तीन वेळा शिवसेना फुटली.तेंव्हा तेंव्हा पक्षप्रमुखांना वेदना झाल्या.त्यांनी खूप तोंडसुख घेतले.हिच वेदना आम्ही मतदारांना झाली नसेल का?याचा विचार शिवसेना प्रमुखांनी केलाच नाही.जोपर्यंत शिंदे,भुसे, गुलाबराव ही मंडळी ठाकरेंना लाभदायक होती, खजिना भरून देत होती, तोपर्यंत नेते,उपनेते,मुलुख मैदानी तोफ अशा अनेक पदव्या देऊन गौरवले.पण जेंव्हा सोडून गेले तेंव्हा गद्दार गद्दार म्हणत ओरडू लागले.ठाकरेंनी ही माणसे आम्ही मतदारांवर लादली.आम्ही सहन केली.आजही असेच सहन करीत आहोत.का सहन करतो ?पक्षाने चुकीची माणसे आमच्या मानगुटीवर बसवली आणि आम्ही त्यांना खाऊन पिऊन डोक्यावर घेतली.त्याचा हा दुष्परिणाम आहे.
असाच प्रकार राष्ट्रवादी ने तद्दन चोर माणसांना, भ्रष्टाचारी माणसांना विधानसभा उमेदवारी दिली.मराठी अस्मिता सांगून मते मिळवली.आम्ही लालची, लोभी, व्यसनी मतदारांनी त्यांना मते दिली.काही काळ पक्षप्रमुखांना या चोरांपासून आर्थिक फायदा होत गेला.पण जेंव्हा हीच चोर मंडळी पक्षप्रमुखाला कोलावून निघून गेली तेंव्हा खूप वेदना झाल्या.काका पुतण्याचे तोंड सुद्धा पाहायला तयार नाहीत.पण काकासाहेबांनी,हेच चोर आमच्या मानगुटीवर बसवले,तेंव्हा आमच्या वेदनांचा विचार कधी केलाच नाही.अरे!आपण बळजबरीने चोरांना मतदारांच्या माथी मारत आहोत.अरे!आपण नालायक माणसांना आमदार, मंत्री बनवत आहोत.
पक्ष हे वरकरणी राजकीय वाटत असले,तसे सांगत असले तरीही त्या लुटारूंच्या गॅंग म्हणून काम करतात.जो कोणी जास्त अपहार करील, भ्रष्टाचार करील, लुटमार करील त्यालाच पदे देऊन पोसतात.त्याला चोरीचे, भ्रष्टाचाराचे धडे देतात.तू इतके घबाड आणले पाहिजे,अशी तंबी देतात.कुशल चोरांना मंत्री पदे देतात.ज्याचा चोरीत हातखंडा आहे त्याला तितकेच मालदार खाते देतात.पकडले गेले तर चोरांना संरक्षण देतात.मोदी शहा यांना चढावा चढवून जेलमधून सोडवून आणतात.हे मतदारांना घातक आहे.लोकशाहीला मारक आहे.
राजकीय पक्ष असणे लोकशाहीला मारक आहे.तर मग पर्याय काय? पक्षांनी जरी नालायक, गुंड, गुन्हेगार माणसांना उमेदवारी दिली तरीही आपण बुद्धिमान ज्ञानी नितीमान प्रामाणिक अभ्यासू कार्यक्षम माणसाला मतदान केले पाहिजे.लोकप्रतिनिधी मतदारांच्या हितासाठी निवडून दिला जातो.पण आपण आपल्या नाही,पक्षाच्या हितासाठी निवडून देतो.ही चूक सुधारली पाहिजे.यासाठीच आम्ही जळगाव जागृत जनमंच ने मतदारांना जागृत करण्याची मोहीम काढली आहे.मला जे कळले ते लोकांना निर्भयपणे सांगतो.यातच खरी लोकशाही सामावलेली आहे.
.. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत