आमदार, खासदार, मंत्र्यांनी गावात फिरण्यापेक्षा विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्यावं.जरांगे पाटलांचं मंत्र्यांना आवाहन

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गावबंदी केलेली असून राजकारण्यांनी गावात फिरकू नये. आमदार, खासदार, मंत्र्यांनी गावात फिरण्यापेक्षा विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण द्यावं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. पाणी आणि औषध घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनीही जरांगेंनी जुमानलं नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मागण्या मान्य कराव्यात, फिरण्यापेक्षा अधिवेशन घ्यावं. मराठा समाजातील मुलांचं भलं व्हावं, असं सरकारला वाटत नाही; असा आरोप जरांगे यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम उपोषणस्थळी दाखल झाली होती. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. तुमच्या सरकारला मराठ्यांचे जीव घ्यायचे आहेत. परंतु आरक्षण घेऊनच मी उपचार घेईन, असं ते म्हणाले. त्यामुळे डॉक्टरांची टीम माघारी गेली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत